मुख्य सामग्रीवर वगळा

अबब……. ! एवढे उद्योग असतांना पण आम्ही रिकामेच

मित्रांनो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हि जी म्हण कोणी म्हटली आहे ती अगदी खरी, कारण करायसाठी खूप आहे पण आपले प्रयत्न्न प्रामाणिक नाहीत त्यामुळे आपण मागे राहिलो आहोत . तसच उद्योगांच्या बाबतीत पण खूप सारे उद्योग आहेत परंतु आपल्याला ती माहितीच नाहीत माहित असतीलही परंतु ती कशी करावी हे माहित नसेल तर त्यासाठी मी आहे ना ! काळजी कसली करता फक्त मिळालेल्या माहितीला मार्गदर्शन समजून आपला उद्योग निच्छित करा तर घ्या हि उद्योगांची लंबीचौडी यादी आणि ते कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती .

व्यवसायाला सुरुवात करताना

व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे व्यवसायाची पूर्वतयारी कशी करावी हे पाहू.
पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. 
  • व्यवसायाचे स्वरूप आणि संधी – 
आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवसायामध्ये मन लावून काम केले जात नाही. त्याचप्रमाणे व्यवसायाला संधी किती आहे याचा विचारही करणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये कोणत्या गोष्टींना सतत मागणी असते, कोणत्या नव्या संधी बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत आहेत, निवडलेल्या संबंधित व्यवसायात व्यवसाय किती संधी आहे याची माहिती घेणेही महत्त्वाचे ठरते.
  • व्यवसायाची जागा – 
काही व्यवसायांसाठी तुम्हाला ग्राहकांना पटकन येता येईल अशी जागा असणे गरजेचे असते, तर काही व्यवसायांसाठी मोठे गोडावून, अथवा साठवणूक करता येईल अशी मोठी जागा असणे गरजेचे असते. अशी जागा थोडी आतल्या बाजूला असली, तरी चालते. मात्र, काही विशिष्ट व्यवसायांसाठी उदा. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री, हॉटेल, कपडे, औषधे, सौंदर्यप्रसाधने यासारख्या व्यवसायांसाठी तुम्हाला जागेची निवड काळजीपूर्वक करावी लागते. उदा. हॉटेल व्यवसायासाठी पार्किंगच्या सोयीचा विचार करावा लागेल. अन्यथा त्याचा परिणाम व्यवसायावर होईल. त्याचप्रमाणे काही व्यवसाय घरगुती स्वरूपाचे असल्यास त्याप्रमाणे घराची रचना करून घेणे इष्ट ठरते.
  • आर्थिक नियोजन  –
व्यवसाय सुरू करताना भांडवल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बँकेकडून कर्ज घेऊन आर्थिक सोय करता येते. कर्ज घेतल्यानंतरही हप्ते भरण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्ष राहणे गरजेचे आहे. आर्थिक शिस्त पहिल्यापासूनच लावून घेतल्यास व्यवसाय स्थिरस्थावर होऊन फायदेशीर होण्यास सुरुवात होते. कच्चा माल, जागेची किंमत या गोष्टींचा विचार भांडवल उभारणी करताना लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे काही वेळा व्यवसाय सुरू करेपर्यंत कच्च्या मालाची किंमत वाढू शकते. त्यामुळे राखीव आर्थिक गंगाजळी ठेवणे गरजेचे आहे. उदा. हॉटेल व्यवसाय करायचा असल्यास, कच्च्या मालाची किंमत सतत बदलत असते. त्याशिवाय नोकरांना पगार आणि बोनस या गोष्टींसाठी योग्य ती तजवीज करणे गरजेचे आहे.
  •  व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण 
कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गरजेनुसार एखादा कोर्स, प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. यामधून व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी होण्यास मदत होते.
व्यवसायासाठी योग्य ती पूर्वतयारी, धाडस आणि आर्थिक समतोल राखला तर नक्कीच यश मिळते.

व्यवसायासाठी आवश्यक संसाधने

कोणताही व्यवसाय सुरु करीत असतांना काही मुलभूत गोष्टींचा विचार करावाच लागतो. ज्यामध्ये जमीन (जागा), भांडवल (पैसे), मनुष्यबळ (कामगार), कच्चा माल (जर गरज असेल तर) या संसाधनांचा विचार सर्वात आधी करावा लागतो. त्याचप्रमाणे मार्केटींग (विपणन), जाहिरात, हिशोब ठेवणे या गोष्टीही तितक्याच आवश्यक ठरतात. या संसाधनांचा योग्य वापर करणे हे कोणत्याही व्यावसाईकासाठी आवश्यक गोष्ट ठरते. व्यवसायासाठी योग्य जागा, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या उभारणीसाठी पुरेसे भांडवल हाताशी असणे आवश्यक ठरते.

काही काही व्यवसायासाठी कच्च्या मालाची गरज लागत नाही. पण जाहिरात आणि विपणन आवश्यकच ठरते अश्यावेळी ती ती कौशल्य असलेली माणसे बरोबर बालागावीच लागतात. ब-याच वेळा व्यावसाईकाच्या अंगी यातली अनेक कौशल्य असतात किंवा त्याला या सर्व बाबींचे किमान ज्ञान असते. परंतू व्यावसाईकाच्या हातात असलेला वेळ आणि कामे याची सांगड घालणे कठीण जाते त्यावेळी त्याला प्रशिक्षीत मनुष्यबळ बरोबर नोकरीला ठेवावेच लागते.

स्वतःचा व्यवसाय सुरु करा

नोकरी करणे किवा मिळवणे प्रत्येकालाच शक्य नसते. तेव्हा स्वतः चा व्यवसाय हा चागला मार्ग आहे.
व्यवसाया विषयी थोडेसे
स्वतः चा व्यवसाय म्हणजे आपण इतर कोणासाठी काम न करता स्वतःच स्वतःसाठी काम करून पैसे मिळवणे. यामध्ये सुरवातीला जरी थोड्या पैश्यची आवशकता भासली तरी एकदा व्यवसाय वाढल्यावर नफाही मिळतो. आणि तो व्यवसायासाठी लागणारा खर्च वजा जाता स्वत:चा असतो. त्यामुळे स्वतः चा व्यवसाय सुरु करताना घाबरून न जाता सुरवातीच्या भांडवला साठी तुम्ही काही सरकारी योजनांचाही लाभ घेऊ शकता. मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
व्यवसाय निवडतांना घ्यावयाची काळजी
सर्वात आधी तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे आणि कुठल्या गोष्टींचा व्यवसाय करण्याची तुमची क्षमता आहे याचा विचार करा, व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणा-या आवश्यक भांडवलाचाही विचार करा. सुरवातीला तुम्ही अगदी छोटा किवा सिझनल व्यवसाय करून ही बाजरपेठेचा अंदाज घाऊ शकता. नंतर हळू हळू जशी मागणी वाढेल तसा  तसा व्यवसाय वाढवू शकता.

उद्योजकाचा मार्केटिंग प्लान

मार्केटिंग म्हटले की, उत्पादन, किंमत, जाहिरात आणि जागा या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.मार्केटिंग करून जर उद्योग केला तर तो उद्योग योग्य दिशेला जातो. तसेच निश्चित केलेले ध्येय साध्य करता येते. उत्पादनाची विक्री वाढवून नफा कमवणे, खर्च कमी व योग्य प्रकारे करणे अशी उद्दिष्ट्ये समोर ठेवली पाहिजेत.
योग्य मार्केटिंग हे ग्राहकांच्या हिताचे, इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यावर भर देते. मार्केटिंगमध्ये नवीन ग्राहक निर्माण करण्यावर आणि ते ग्राहक टिकवण्यावर भर दिला पाहिजे.
वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन, उच्च प्रत आणि उत्तम मार्केटिंगची डीएसके, चितळे, गाडगीळ अशी अनेक उदाहरणे आहेत.
मार्केटिंग प्लान तयार करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे : 
● उद्योगाची ध्येय आणि दूरदृष्टी.
● विशिष्ट नियोजनात्मक वेळापत्रक.
● मार्केटिंगचे उद्दिष्ट.
● स्वत:चे सामर्थ्य, उणिवा, धोका आणि संधी.
● जोखीम पत्करण्याचे धाडस.
● सुसंवाद कौशल्य.
● मार्केटिंगची अपेक्षित बाजारपेठ.
● उत्पादनातील खुबी आणि वैशिष्ट्ये.
● मार्केटींगचे घटक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
● बजेटची मार्केटिंगमधील तरतूद.
● ग्राहकाभिमुख सेवा.
मार्केटींगचा प्लान यशस्वी करण्यासाठी जिद्द, परिश्रम आणि कौशल्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. उद्योगातील तज्ञ व्यक्ती आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज आवश्यक आणि लाभदायक ठरते.
मग तयार करताय ना... मार्केटींग प्लान ! 

विक्रीची कला

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असते. वस्तूंचे आर्थिक विनियोग घडवून आणण्यासाठी विक्रेता जी कौशल्यपूर्ण कला वापरतो. त्याला ‘विक्रीची कला’ म्हणतात. व्यापारी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन तयार करतात. विक्रेता हा माल किंवा वस्तू प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोचवतात.                                        
विक्रेत्याला वस्तूची विक्री करण्यासाठी ग्राहकांशी संपर्क, प्रदर्शन, मालाचे सादरीकरण, वस्तूची उपयुक्तता आणि कमीत कमी किमतीत वस्तूंची खात्री द्यायला लागते. उत्पादनाची जाहिरात ही वर्तमानपत्र-साप्ताहिके-मासिके-अंक, टीव्ही चॅनल्स, होर्डिंग्ज, पत्रके, सवलती किंवा योजना, कार्यक्रमाचे प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) घेणे, फ्री सॅम्पल अशा अनेक प्रकारे जाहिरात केली जाते. जाहिरातीने विक्रेते आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली आहे, याचा प्रसार आणि प्रचार केला जातो.
विक्रीची कला यामध्ये वस्तूची जाहिरात महत्त्वाची  मानली जाते. ग्राहकांचे मन जिंकण्याचे प्रयत्न विक्रेता करतो. ग्राहक उत्पादनाशी जोडला तर तो ग्राहक टिकवून विक्रेता दुसरे ग्राहक शोधात असतो. ग्राहकाचे वस्तूशी समाधान झाले की तो ग्राहक पुन्हा खरेदीसाठी येईल याची विक्रेता काळजी घेतो.
• विक्री कलेतील वैशिष्ट्यपूर्ण घटक :
• विक्रीचा प्रामाणिक प्रयत्न करणे.
• ग्राहकांचे मत जाणून त्यांना खरेदीकडे वळवणे.
• ग्राहकांचा विश्वास साधणे.
• ग्राहक आणि विक्रेत्याचा फायदा हा चांगली सेवा देऊन करणे.
• वस्तूंची संपूर्ण माहिती देऊन निर्यात करणे.

• विक्री कलेची तंत्रे : 
• मालाची, उत्पादनाची आणि वस्तूंची चांगल्या आणि आकर्षक पद्धतीने मांडणी करणे.
• ग्राहकांना वस्तूंची सविस्तर माहिती देणे.
• रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून आकर्षक जाहिरात तयार करून त्यांचा प्रसार करणे.
• गॅरंटी, वॉरंटी, सर्व्हिस, संपर्क अशी माध्यमे वापरून ग्राहकांशी संपर्क वाढवून उत्तम सेवा देणे.
• फ्री सॅम्पल सारख्या योजना देऊन ग्राहकांना आकर्षित करणे.
• ग्राहकांच्या शंकांचे समाधान करणे आणि तक्रारींचे निवारण करणे.
अशा प्रकारे विक्रीची कला ही प्रत्येक विक्रेत्याला अवगत झाली पाहिजे.


कृषि विषयक उद्योग

 भारतात ८० ते ८५ टक्के उत्पन्न हे शेती आणि शेतीविषयक उद्योगातून येते. शेतीला पूरक असे अन्न प्रक्रिया, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय असे अनेक प्रकारचे उद्योग चालू असतात. 
उसाची शेती आणि त्याच्या उद्योगाविषयक उदाहरण : उसाची शेती ही साखर उद्योगाला पूरक आहे, उसाचा रस हा आरोग्यासाठी गुणवर्धन ठरतो. उसाच्या चिपाडापासून कागद निर्मिती होते. साखर हा दैनंदिन गरजेचा पदार्थ आहे. म्हणून आर्थिकदृष्ट्या साखर उद्योग हा नफा देणारा ठरतो. असाच दृष्टीकोन सर्व शेती पूरक उद्योगासाठी ठेवला पाहिजे. नारळ, आंबा, तांदूळ, गहू, स्ट्रोबेरी, मसाले असे अनेक पदार्थ आहेत. आयात-निर्यातीच्या कृषि उद्योगातून परदेशी  चलन उपलब्ध होऊन परकीय गंगाजळीत वाढ होते.
शेळी ही गरीबाची गाय मानली जाते. कारण तिला राहण्यासाठी कमी जागा लागते, तिचा खुराक कमी असतो. शेळीचे दुध आरोग्यदृष्ट्या लाभदायक ठरते. मत्स्य शेतीचा कृषि उद्योगांमध्ये महत्त्व फार असते. ओली मासळी आणि सुकी मासळी असे दोन प्रकार असतात. त्याचा हॉटेल उद्योगासाठी मोठी मागणी आहे. माशांचे अनेक प्रकार असून मत्स्यशेती ही कृत्रिमरित्यासुद्धा केली जाते. अशा प्रकारे शेती हा कृषि विषयक उद्योगांचा पाया आहे.भारतीय औद्योगिक विकासाला हातभार कृषि विषयक उद्योगातून मिळतो. 

 


शेळीपालन


भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी संकरित गायी पाळणे, कुक्कुटपालन यांसारखे जोड व्यवसाय करतात. शेळीपालन  हा त्यापैकी एक अत्यंत फायदेशीर पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.
शेळीपालनाची वैशिष्टये 
  • शेळी कुठल्याही हवामानात जगू शकते. विशेषतः उष्ण व कोरडया हवामानात शेळीची वाढचांगली होते. 
  • शेळीच्या आहारात मुख्यत्वेकरून झाडांचा पाला असतो. त्यात बाभूळ, चिंच, पिंपळ, शेवरी, बोर, अंजन यांचा समावेश होतो.
  • शेळीसाठी जागा कमी लागते. भांडवल कमी लागते. 
  • शेळीचा गर्भकाळ इतर दुभत्या पाळीव जनावरांच्या गर्भकाळापेक्षा कमी म्हणजे १५० दिवस इतक्या कालावधीचा असतो व भाकडकाळ कमी असतो.
  • शेळीचे दुध पचनास हलके असते व लहान मुलांना देण्यासाठी अधिक उपयुक्त असते. 
  • शेळीच्या लेंडीखताला सेंद्रीय खत म्हणून फार किंमत आहे. टाक शेळी वर्षाला २०० किलो लेंडीखत देते. 
शेळ्यांचे व्यवस्थापन 
  • शेळ्यांना मोठया गोठयांची आवश्यकता नसते. उसाचे पाचट किंवा गवत वापरून तयार केलेले छप्पर, ऊन वाऱ्यापासून आडोसा होण्याइतपत चार फुट उंचीची भिंत व त्या ठिकाणी खाद्याची व्यवस्था इत्यादी सोयी असलेला गोठा शेळ्यांकरिता उत्तम आहे. 
  • बंदिस्त जागा प्रत्येकी १२ चौ. फुट व मोकळी जागा प्रत्येकी २५ चौ. फुट असावी. 
  • खाद्याचे  प्रमाण साधारणतः प्रतिदिनी हिरवा चारा तीन – चार किलो, वाळलेला चारा राक किलो. टाक लीटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना १०० ते २०० ग्रामपर्यंत खुराक देणे आवश्यक आहे. 
  • शेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वड व पिंपळ झाडांचा पाला व फळे शेतीला आवडतात. 
  • प्रत्येक शेळीस दर दिवशी तीन ते चार लीटर पाणी प्यावयास लागते. 
करडांची जोपासना 
  • करडू जन्माला आल्यानंतर नाळ कापणे, नख्या कोरणे व सहा तासांच्या आत पहिले दुध पाजणे महत्वाचे आहे. 
  • करडू जन्माला आल्यानंतर पहिल्या २४ तासांत पिईल तेवढा चिक त्यास पिऊ देणे आवश्यक असते.
  • करडयाच्या वजनाच्या राक अष्टमांश इतका चीक प्रत्येक दिवशी त्यास पाजणे गरजेचे आहे.
म्हणून शेळीपालन कमी जोखमीचा आणि उत्तम आर्थिक लाभ मिळवून व्यवसाय देणारा आहे.

शेळ्यांच्या जाती

महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून  शेळ्यांच्या विविध जाती आढळतात. मांस व दूध देणाऱ्या जातींमध्ये महाराष्ट्रातील उस्मानाबादी, उत्तर-प्रदेशातील बारबेरी व जमनापारी, गुजरातमधील मलबारी, मेहसाना व झालावाडी, राजस्थानातील सिरोही, अजमेरी व कच्छी तर पंजाबातील बीटल सारख्या जातींचा समावेश होतो.
शेळी: जातीनिहाय वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील उस्मानाबादी शेळ्या त्यांच्या मांस व दुधासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहेत. या शेळ्या भराभर वाढतात व वर्षभरातच ४०-५० किलो वजनाच्या होतात. या शेळ्यांमध्ये जुळे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या पाळण्यासाठी सर्व अंगाने परवडतात. जातिवंत उस्मानाबादी शेळ्या या रंगाने काळ्या असतात, तसेच त्यांची शिंगे मागच्या बाजूने वळलेली असतात. या शेळ्यांचे कान लांब असून त्यांवर ठिपके असतात.कोकणातील शेळ्यांमध्ये स्थानिक सुधारणा करून कोकण कन्याळ ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. या जातीचा पूर्ण वाढीचा बोकड ५२ तर शेळी ३२ किलो वजनाची भरते. कोकण कन्याळ शेळी १७ व्या महिन्यात पिलाला जन्म देते.या शिवाय मांस उत्पादनासाठी आसाम डोंगरी, काळी व तपकिरी बंगाली, मारवाडी, काश्मिरी, गंजभ या जाती चांगल्या आहेत

रेशीम शेती

रेशीम शेती: कमी भांडवलात हमखास उत्पन्न
रेशीम शेती हा शेतीस पूरक व्यवसाय असून तो अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्यांची पैदास होत असते. अशा या उपयुक्त तुतीची लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते.
एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. .तुतीची लागवड एकदा केल्यानंतर ते झाड साधारणतः 15 वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकयांस देखील हा व्यवसाय करता येतो.
तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते.

रेशीम उद्योग-कापड निर्मिती

हातमागाने कापडनिर्मिती अधिक सोयीची:
एक विणकर एका हातमागावर साधारणतः ३-४ मीटरपर्यंत रेशीम कापड विणतो. रेशीम कापडावर डिझाईन हे धोटा, डॉबी, जेकॉर्डच्या सहाय्याने रंगीत धागे वापरुन काढता येते. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई करता येते. तसेच भरतकाम व डिझाईनस् काढता येते. भांडवली गुंतवणूक लक्षांत घेता यंत्रमागापेक्षा हातमाग आर्थिकदश्ष्टया व रेशीम कापडाचे वेगळेवेगळे नमुने काढण्यास उपयुक्त ठरतो. हातमागाची पीटलूम, पॅडल हातमाग व अर्धस्वयंचलित हातमाग हे तीन प्रकार आहेत. अशा रितीने तयार केलेले रेशीम कापड आकर्षक पॅकिंग करुन विक्रीसाठी पाठविले जाते. ज्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे.
कामधेनु प्रतिष्ठान शेणोली, ता. कराड, जिल्हा-सातारा शेणोली गांवातील तेरा सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांनी शेती धंद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या ध्यासाने एकत्र येऊन कामधेनु प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. नंतर त्यांनी प्रत्येकी एक एकर मध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योग सुरू केला. यात त्यांना बँकेकडून आर्थिक साहाय्य मिळाले होते. त्यांना रेशीम उद्योगापासुन भरपूर अर्थिक लाभ झाला. सदर संस्थेचे यश पाहुन गावांमध्ये जवळपास ५० एकरवर तुतीची लागवड झाली. संस्थेने यापुढे जाऊन सुत निर्मिती प्रकल्पाकरीता एम आय डी सी कराड येथे जागा घेतलेली आहे. 

रेशीम कीटकांचे पालन

रेशीम शेतीमध्ये महत्वाचा घटक म्हणजे रेशीम कीटक. यांचे पालन व्यवस्थित करणे फार महत्वाचे असते. रेशीम कीटकांच्या पालन तंत्रज्ञानात हवामानानुसार आवश्यक बदल घडून आणल्यास रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यास वर्षभर रेशीम कीटकांचे पालन करणे सोईचे होतेच याशिवाय ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरते. परंतु हवामानानुसार तापमान, आद्रता व वातावरणातील योग्य ती खबरदारी न घेतल्यास त्याचा रेशीम कीटक पालनावर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होते, रोगांचा पादुर्भाव होतो, तसेच रेशीम कोशाचा दर्जा सुद्धा खालावतो. अशामुळे भाव कमी होतो व तोटा सहन करावा लागतो.
रेशीम कीटकांच्या वाढीसाठी व योग्य शारीरिक क्रियांसाठी तापमान व आद्रतेचे महत्व असते. रेशीम कीटक हा थंड रक्ताचा प्राणी असून शरीराचे तापमान वातावरणातील तापमानानुसार बदलत असते. रेशीम कीटकांचे पालन १५ ते ४० अंश सेल्सियस तापमानात करता येत असले तरी योग्य वाढ व शरीरक्रियासाठी २२ ते २४ अंश सेल्सियस तापमान रेशीम कीटकांना पोषक असते. त्याचप्रमाणे आद्रतेचा देखील रेशीम कीटक पालनावर परिणाम दिसून येतो. आद्रता कमी झाल्यास रेशीम किटकाच्या अन्नग्रहण, पचन, रक्तातील आम्ल- विम्ल निर्देशांक, शरीरातील टाकाऊ वायू बाहेर येण्यास व्यत्यय येतो. तसेच उन्हाळ्यात देखील आद्रता कमी असल्यामुळे पाने सुकतात त्यामुळे कीटक कमी पाला खातात. त्याचबरोबर पानाचाही दर्जा कमी होतो.
कीटक संगोपन गृह-
कीटक संगोपन गृह थंड जागेत असावे किंवा सावली असेल त्या ठिकाणी दक्षिण- उत्तर दिशेने बांधावे. मातीच्या जाड भिंती, पालापाचोळा, कौलारू किंवा ऍसबेसटॉप पत्रे वापरून कीटक संगोपन गृह बांधावे. कीटक संगोपनाच्या छतावर नारळ, भात, गवत इत्यादीचा वापर केल्यास तापमान नियंत्रणास मदत होते. तसेच छतावर मारण्यासाठी विशिष्ठ पद्धतीचे पेंट बाजारात मिळतात, त्यांचा वापर केल्यास ५ ते ६ अंश सेल्सियस कमी होते. कीटक संगोपन गृहाच्या पश्चिम बाजूस विविध झाडे वाढवावीत. प्रामुख्याने तुतीचे झाडे लावल्यास दुहेरी फायदा होतो. पश्चिमेकडील सूर्यकिरणे थोपवून जातात, शिवाय तुतीझाडाचा पालाही कोशनिर्मितीसाठी उपलब्ध होतो.

रेशीम शेती उद्योग

देशात रेशीम उद्योग आणि तुती लागवड क्षेत्र वाढत आहे. साठ हजाराहून अधिक खेड्यात हा उद्योग राबविला जातो. विदभार्तही मोठ्या प्रमाणात तुती लागवड क्षेत्र वाढले आहे. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱया या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. यशस्वी रेशीम उद्योगासाठी तुतीची शास्त्रीय दृष्टीकोनातून लागवड होणे गरजेचे आहे.
रेशीम उद्योग शेतीवर आधारित असा कुटीरोद्योग आहे या उद्योगातून ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटकसंगोपन व धागानिमिर्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो तर अनेक नगदी पिकांच्या तुलनेत हा उद्योग फायदेशीर आहे. या उद्योगामुळे शहरी संपत्ती सहजपणे ग्रामीण नागरिकांकडे वळली जाते. रेशीम उद्योगातून दिवसेंदिवस आपल्या देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे. उच्च प्रतिच्या रेशीम धाग्यास जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे मागणी लक्षात घेता दुबार (बायव्होल्टाईन  जातीच्या कोषउत्पादनाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या तंत्राचा वापर करून तुतीची लागवड करणे फायदेशीर ठरेल.
तुती व रेशीम उद्योगाचे यश हे तुतीच्या एकरी उत्पादित होणाऱ्या पानांवर अवलंबून असते. राज्याचे कृषी विषयक हवामान अवलंबून असते आपल्या राज्याचे हवामान. तुतीच्या व   वषर्भर पानांच्या निमिर्तीसाठी पोषक आहे .त्यामुळे तुती वाढीसाठी चांगले वातावरण मिळते
तुती लागवडीबाबत घ्यावयाची काळजी :
तुती लागव़ड वाहनांची वाहतूक जेथे जास्त आहे, अशा रस्त्याच्या कडेने करू नये. कारण पानांवर धूळ मोठ्या प्रमाणात बसल्यास अशी पाने रेशीमकीटकसंगोपनासाठी योग्य ठरत नाही कीटकनाशकांचा वापर ज्या पिकांवर वारंवार करावा लागणार आहे,त्या पिकांच्या जवळ तुती लागवड करू नये, त्यात किमान शंभर मीटर अंतर ठेवावे.

रेशीम शेती-उद्योगातून होणारे फायदे

  1. रेशमाच्या अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते. 
  2. तुतीचा वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो. 
  3. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
  4. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
  5. तुतीच्या पानांमध्ये जीवनसत्वांचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे. 
  6. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
  7. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.
       

बागायती शेती


ज्या शेतीला बारमाही पाणी उपलब्ध असते. अशा शेतीला ‘बागायती शेती’ म्हणतात. बागायती शेतीत खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात पिके घेतली जातात किंवा जेथे खरीप  आणि रब्बी या दोन्ही हंगामात हमखास पाणी पुरवठा करणे शक्य आहे तेथे दोन पिके घेतली जातात.
बागायतीचे दोन प्रकार
  • विहीर बागायत 
  • पाटाखाली क्षेत्र 
महाराष्ट्रात बागायती शेतीमध्ये ऊस, कापूस, गहू, हरभरा, भुईमूग, सुर्यफुल, सोयाबीन, भात, ज्वारी ही बागायती पिके घेतली जातात. महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक क्षेत्र हे विहिरीच्या पाण्याखाली भिजते, तर निम्म्याहून कमी क्षेत्र पाटाखाली भिजते. विहीर बागायतीत जेव्हा हवे तेव्हा पाणी उपलब्ध असते. तर पाटाखाली क्षेत्राला विशिष्ट कालमर्यादेने पाणी मिळते. बागायती शेतीमध्ये वर्षातून दोन, तीन किंवा चार पिके घेतली जातात. त्यामुळे बागायती शेतीत जमिनीचा वापर जास्त होतो.
बागायती शेतीची उद्दिष्टये
  • बागायती शेतीमध्ये पिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा देता येत असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. 
  • बागायती शेतीत पिक उत्पादनाची हमी असते. 
  • बागायती शेतीत वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते.
  • बागायती शेतीतून आर्थिक उत्पन्न मोठया प्रमाणावर मिळते. त्याचबरोबर शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचे महत्वाचे काम बागायती शेतीमधून होताना दिसते.
    

उद्यानविद्या: स्वयंरोजगाराच्या संधी

 उद्यानविद्या क्षेत्रात स्वंयरोजगाराच्या काही संधी –
शेती पारंपारिक पद्धतीने केली जाते. ती ब-याचदा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. परंतू उद्यान विद्या सारख्या क्षेत्रात आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याने त्यामध्ये व्यावासायासाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. स्वयंपाक घरात लागणा-या वस्तू पासून फळे, भाजीपाला, फुले त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात इमारतीच्या आवारात शुशोभीकरणा ची ही गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या अनेकानेक संधी उपलब्ध होत असतात. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
  • विविध फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी वनस्पतींची व्यापारी तत्त्वावर लागवड.
  • विविध पिकांच्या व्यावसायिक तत्त्वावर रोपवाटिका उभारणी.
  • फुले व भाजीपाला बियाणे उत्पादन.
  • सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादन.
  • विविध पिकांची हरितगृहात लागवड.
  • उद्यानविद्या मार्गदर्शक (Horticulture Consultant)
  • फुलापासून हार विक्री व सजावटीचे काम (Flower Decorator)
  • लॉन उत्पादन व विक्री.
  • शीतगृहाची उभारणी.
  • फळे, भाजीपाला व लागवडीची पिके (रबर, नारळ, काजू, कोको) इत्यादी. वर आधारित प्रक्रिया उद्योग.
  • कृषी / उद्यान पर्यटन (Agri Tourism)
  • विविध पिकांच्या निर्यातीद्वारे.

    वनौषधी

    प्राचीन काळापासून औषधी वनस्पती त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे मानवाच्या वापरत आहेत. आयुर्वेदाने केलेल्या अभ्यासानुसार सुमारे २००० वनस्पतीमध्ये निरनिराळे आजार बरे करण्याची क्षमता असुन सुमारे १३०० वनस्पती त्यांच्या निरनिराळ्या सुगंध व स्वादासाठी प्रसिद्ध आहेत.
    वनौषधी वनस्पतींची वैशिष्ट्ये
    • जागतिक पातळीवर वनौषधी वनस्पतींना फार महत्वाचे स्थान आहे.
    • वनस्पतीजन्य औषधांचा वापर मोठया प्रमाणावर वाढत असुन काही औषधी वनस्पतींची लागवड शास्त्रीयदृष्ट्या सुरु करण्यात आलेली आहे.
    • औषधी वनस्पतीची जागतिक व्यापाराची वार्षिक उलाढाल सुमारे ६० दशलक्ष डॉलरची आहे.
    • भारतातून सध्या सुमारे ४५० कोटी रुपयांची वनस्पतीजन्य औषधे विविध देशांमध्ये निर्यात केली जातात.
    • औषधी वनस्पतींपासून विविध औषधे व सौदर्य प्रसाधने बनविली जातात.
    • मानवी जीवनात औषधी वनस्पतींना अन्यन्यसाधारण महत्व असल्याने औषधी वनस्पतीखालील लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
    आपल्या देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक परिस्थिती, जमीन व हवामान यामध्ये असलेली विविधता औषधी वनस्पतीचा लागवडीसाठी अतिशय अनुकूल आहे. वनस्पतीजन्य औषधांमुळे इतर अनिष्ट  परिणाम होत नसल्याने त्याचबरोबर औषधी वनस्पतींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणात मदत होताना दिसते. आपल्या देशातून साधारणतः ४० औषधी वनस्पतीची लागवड विविध प्रदेशांमधून केली जाते. आज आपण पहिले तर असे दिसून येते जंगलातून सहजपणे ज्या वनौषधी उपलब्ध होत होत्या त्यांचेही प्रमाण कमी होत चाललेले दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनौषधी प्रजातीची शेती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
    औषधी वनस्पतींच्या क्षेत्रवाढीस भविष्यात चांगला वाव आहे. उत्पादक शेतकरी, खरेदीदार/ उद्दोजक, संशोधन संस्था, वनखाते व विस्तार यंत्रणामधील योग्य तो समन्वय साधून या क्षेत्राच्या सर्वांगीण विकास करणेकरिता महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे कार्यरत आहे.

    औषधी वनस्पती – अर्जुन, बेल, अडुळसा

    अर्जुन, बेल, अडुळसा या औषधी वनस्पती आपल्यासाठी खुपच महत्वाच्या आहेत. आयुर्वेदात या वनस्पतींना मानाचे स्थान दिले गेले आहे. भारतात या वनस्पती सर्वात अधिक प्रमाणात आढळतात. विविध मानवी विकारांवर गुणकारी असणाऱ्या या वनस्पती ग्रामीण भागात घराजवळ लावण्याची प्रथा आहे.
    अर्जुन
    अर्जुन ही सदाहरित वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हा वृक्ष बिहार, हिमालय, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात आढळतो.
    उपयोग:
    • सालीचे चूर्ण व दुध यांचा काढा हा पोटाला मुकामार बसला तर उपयोगी आहे.
    • सालीचा काढा दुधातून हृदयरोगावर अत्यंत उपयोगी असून त्याला हृदय टॉनिक म्हटले तरी वावगे होणार नाही. 
    • हाड मोडले तर जोड सांधण्यासाठीही याचा उपयोग होतो.
    • यांच्या पानांचा ताजा रस कान दुखत असेल तर उपयोगी पडतो.
    • रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुन सादडा पोटात देतात. याने रक्त शुद्धी चांगली होते.
    • मार, ठेच, वृणशोध, हात-पाय मोडणे, या गोष्टी बऱ्या करण्यासाठी अर्जुनासारखे मौल्यवान दुसरे औषध नाही.
    बेल
    बेल हा वृक्ष हिमालय, सह्याद्री, सातपुडा पर्वतांच्या दरम्यान सर्व ठिकाणी आढळतो.
    उपयोग:
    • बेलाची मुळे, त्रिदोषामध्ये होणाऱ्या तापावर गुणकारी असून मुत्राविकार, पाठीच्या कण्यातील वेदना, दयाची धडपड इत्यादींवर गुणकारी आहे.
    • बेलाचे मूळ पाणी पाचक असून वात आणि कफ यांचा नाश करते तसेच नेत्र विकार, बधिरता आणि त्वचेला येणारी सूज यासाठी गुणकारी आहे.
    • बेलाची फुले तृष्णा, वामन आणि अतिसार इ. आजारात वापरतात.
    • मेंदू आणि हृदयाच्या स्वास्थासाठी फळातील गर अतिशय लाभदायी आहे.
    अडुळसा
    याची फुले पांढरी असतात व फुलांना देठ नसतो. फळे टोकाला लागतात.
    • सर्व प्रकारचा खोकला, घशाचे आजार, कफाचा विकार, दम या रोगांवर अडुळसा हे रामबाण औषध आहे.
    • अडुळसा हे संधिवात, गुडघेदुखी आदी दुखण्यांवरही उपायकारक आहे.
    • सध्याच्या प्रदूषणाच्या काळात घशाचे विकार खूप प्रमाणात होत आहेत. अशा वेळेस आपणांस आपले परसबागेत, गच्चीवर, कुंडीत, अडुळशाची रोपे लावणे नितांत गरजेचे आहे.
        

    निलगिरीचे महत्व

     निलगिरी बहुगुणी, बहुउपयोगी आणि जलद वाढणारे झाड आहे. एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात निलगिरीचा अंतर्भाव केला आहे. सर्व प्रकारच्या प्रदेशात हे झाड वाढत असल्याने सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत निलगिरीला महत्त्वपूर्ण स्थान आहे.
    • निलगिरीच्या विविध जाती :-
    • युकॅलिप्टस हेरे कर्टिस. – निलगिरी पर्वतावर आढळते.
    • युकॅलिप्टस गोल्बूलस.
    • युकॅलिप्टस ग्रँडीस.
    • युकॅलिप्टस कॅमलडुलेन्सिस. – निलगिरी पर्वतावर आढळते.
     • हवामान :- 
         अत्यंत उष्ण, कमी पावसाच्या प्रदेशापासून ते शीत हवामान असलेल्या प्रदेशात निलगिरीची लागवड केली जाते.
        निलगिरीचे झाड वाळले म्हणजे त्याच्या वजनात एक तृतीयांश घट येते व ते एक चांगले इंधन असून त्याचे कॅलरीफिक मूल्य ४७०० ते ४८०० कॅलरीज प्रती किलोग्रॅम आहे.
     • जमीन :-
         निलगिरीची वाढ जास्तीत जास्त प्रमाणात खडकाळ, परंतु सुपीक, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या आणि ओल साठवून ठेवणाऱ्या जमिनीत चांगली होते.
     • लागवड :-
         जून महिन्यात रोपांच्या लागवडीसाठी खड्डे करवेत. २२ मी. किंवा २३ मी. किंवा ३३ मी. अंतरावर ही लागवड करावी.निलगिरीच्या घनदाट लागवडीसाठी ०.६ × ०.६ मी. अंतरावर लागवड उपयुक्त ठरते.
     • उत्पादन :-
      निलगिरी लागवडीपासून हेक्टरी २० ते ३० हजार इतका फायदा होतो.
     • उपयोग :-
    1. पाने व कोवळ्या फांद्यांपासून निलगिरी तेल काढतात. त्याचा औषधी,औद्योगिक व सुगंधी तेल निर्मितीसाठी उपयोग होतो. तसेच निलगिरीचे लाकूड औद्योगिक उपयोगासाठी व ७० प्रकारच्या तेल औषधांसाठी वापरले जाते.
    2. औषधी तेलात सिनीओल जास्त आहे. त्यापासून साबण, स्प्रे व औषधी गोळ्या तयार करतात.त्यांचा उपयोग सर्दीवर होतो. तसेच रोगप्रतिबंधक औषधी, तसेच वेदानांवरही वापर करतात. सिनीओल हे निलगिरी तेलातील महत्वाचे द्रव्य आहे.
    3. निलगिरीच्या झाडांपासून कागद निर्मिती केली जाते. त्याचे वनसंशोधन केंद्र डेहराडून येथे आहे.
    4. निलगिरीपासुन रेऑनचे धागे तयार करतात.
    5. या झाड्याच्या सालीपासून वा बुंध्यातून पाझरणाऱ्या स्त्रावामुळे कातडी कमविण्यास लागणारे  टेनिनसारखे द्रव्य मिळते. ते औषध व डिंक तयार करण्यासाठी वापरता
    6. वनएरंड

      वनएरंड बियांमध्ये  सर्वाधिक ३५% ते ४०% अखाद्य तेलाचे प्रमाण असते.या वनस्पतीपासून बायोडिझेल या महत्वाच्या इंधनाची निर्मिती करता येणे शक्य असल्याने वनएरंडाची लागवड करणे काळाची गरज बनली आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सर्वप्रथम या झाडाची लागवड राष्ट्रपती भवनात केली होती. शेतकऱ्यांत या वनस्पती बाबतची जागृती घडवून त्यांना वनएरंड लागवडीसाठी प्रोत्साहीत करायला हवे.
      वनएरंडाची स्थानिक नावे पुढीलप्रमाणे – 
    7. रतनज्योत.
    8. पारशी एरंड.
    9. मोगली एरंड.
    10. चंद्रज्योत.
    11. जमल गोटा इंग्रजीत याला जट्रोफा म्हणतात.
    हवामान – अवर्षणग्रस्त व बेताचा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात वनएरंड चांगला येतो.
    जमीन – लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. मध्यम जमीन अनुकूल असते.
    लागवड – जुने ते जुलै महिन्यात करावी. लागवड बियांपासून करावी.
    अंतर – बागायतात २ मी. × २ मी. अंतरावर करावी. जिरायातात १.७५ मी. × १.७५ मी. ओळीत अंतरावर करावी.
    पाणीपुरवठा – नियमित व पुरेसा पाणीपुरवठा असल्यास उत्पादन चांगले मिळते.
    उत्पादन – प्रत्येक फळात ३ ते ४ बिया असतात. १० वर्षानंतर प्रत्येक झाडास हेक्टरी १२०० ते १३०० किलो बिया निघतात.
        

कुक्कुटपालन

 आपल्या कडेच नव्हे तर संपूर्ण भारतात कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून अत्यंत उपयुक्त, असल्यामुळे किफायतशीर ठरलेला आहे.
कुक्कुट पालनाची  वैशिष्ट्ये
  • शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कुक्कुट पालनाचा व्यवसाय मोठया प्रमाणावर केला जातो.
  • या धंद्यात गुंतवणूक केलेले भांडवल लवकरच मिळते.
  • कोंबड्या पासून अंडी, मांस तर मिळतेच त्यचबरोबर कोंबड्यांचे खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त म्हणून मोठया प्रमाणावर त्याला मागणी असते.
  • जर मांसल कोंबड्या पाळल्या, तर ह्या धंद्यात नफा दोन महिन्याच्या आतच मिळतो. तसेच गुंतवणूक केलेले भांडवल पुन्हा धंद्यामध्ये गुंतवता येते.
कोंबडी  पालनाचा धंदा कसा करावा हे देखील एक शास्त्र आहे. हा धंदा चार प्रकारे सुरु करता येतो.
  • उत्कृष्ट जातीची उबवण्याची अंडी आणावयाची वं ती खुडुक कोंबडी खाली उबवायची. या पद्धतीत पिल्ले वाढवण्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे.
  • एक दिवसाची पिल्ले विकत आणावयाची व त्या पिल्लांची योग्य निगा ठेऊन चांगली वाढवायची.
  • तीन महिन्याच्या मद्या विकत आणावयाच्या व धंदा सुरु करावयाचा.
  • चौथा मार्ग म्हणजे सरळ अंड्यावर आलेल्या पाच ते सहा महिन्याच्या माद्या खरेदी करावयाच्या. या पद्धतीमध्ये कोंबड्या जातिवंत व अंडी देणाऱ्या आहेत की नाही हे तपासून घेणे गरजेचे असते.
कुक्कुट पालन धंद्यातील महत्वाच्या बाबी.
  • कोंबड्यांच्या सुधारित जाती, त्यांची निवड व पैदास.
  • कोंबड्यांचे खाद्य.
  • कोंबड्यांची जोपासना, निगा व घरे 
  • कोंबड्यांचे आरोग्य प्रतिबंधक उपाय व औषधे.
  • योग्य पद्धतीने व वेळेवर अंड्यांची व मटणाची विक्री.
इतर सर्व गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. अशा प्रकारच्या आधुनिक ज्ञानाचे या धंद्यातून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल.

कोंबड्यांचे आजार आणि त्यावरील उपचार

कोंबडीच्या वाढीबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे ठरते. योग्य वेळी योग्य उपचार झाले नाहीत तर त्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. आहार, स्वच्छता, रोगनिदान आणि उपचार या गोष्टींना या व्यवसायात अनन्य साधारण महत्व असते.
कोंबड्यांना खालीलप्रमाणे आजार होतात.
  • जीवाणू जन्य – कॉलरा, तुरा निळा होणे इ.
  • विषाणू जन्य – राणीखेत (मानमोडी), गंबोरी (रोग प्रतिकारक शक्ती नष्ट होणे), मेरेक्स (पिल्ले पांगळी होणे)  
  • आदिजीवजन्य – कॉक्सीडीओसीस (रक्ताची हगवण)
भारत सरकारने देशातील शेतक-यांना कुक्कुटपालन विषयक सेवा एक खिडकी तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी चार ठिकाणी केंद्रीय पोल्ट्री विकास संस्था (Central Poultry Development Organization) स्थापन केलेल्या आहेत. त्या चंदीगड, भुवनेश्वर, मुंबई, आणि हेसरघट्टा येथे आहेत.भारत सरकारने ५ कुक्कुटपालन फार्मस (Poultry Farms) स्थापन केले आहेत. बेंगलोर, मुंबई, भुवनेश्वर, दिल्ली व सिमला या ठिकाणी ते फार्मस आहेत. या ठिकाणी जातीवंत कोंबड्या संकरीत करून वितरीत केल्या जातात.
कोंबड्यांच्या संशोधना बद्दलचे केंद्रीय एव्हीयन संशोधन हे केंद्र ( Central Avian Research Centre) उत्तरप्रदेशात इज्जत नगर येथे स्थापन करण्यात आले आहे.२००९ ते २०१० मध्ये सरकारने केंद्र पुरस्कृत पोल्ट्री विकास योजना (Poultry Development Schemes) नावाची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण परसदार (पारंपारिक) कुक्कुट विकास (Rural Backyard Poultry) नावाची उपयोजना सुध्दा सुरु केली आहे.

व्यवस्थापन आणि संगोपन

कुक्कुटपालन हा एक महत्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे. जगात कोंबड्यांच्या एकूण ६६ जाती आहेत. त्यापैकी भारतात १८ जाती आढळून येतात. भारत हा अंडी उत्पादन करणारा जगात पाचवा तर मांस उत्पादनात जगात नववा देश आहे. कुक्कुट पालन हा व्यवसाय भूमिहीन मजुरांसाठी दुय्यम उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय पारंपारिक तसेच व्यावसाईक अशा दोन्हीही पद्धतीने करता येतो.
खाद्य व्यवस्थापन 
संतुलित खाद्य, रोग प्रतिबंधात्मक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सूत्रांच्या आधारे कोंबड्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या व्यवस्थापनाचे तीन टप्पे पडतात.
  • लहान पिलांची निगा राखणे (एका दिवसापासून सहा आठवड्यांपर्यंत) - या प्रक्रियेला बृडींग असे म्हणतात. या दरम्यान ‘चीकमेश’ प्रकारचे खाद्य पिलांस दिले जाते. त्यात २२ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध पदार्थांचे प्रमाण असते.
  • ६ आठवड्यांपासून २० आठवड्यांपर्यंतची निगा - या कालावधीत शरीर वाढीसाठी ‘ग्रोअर मेश’ प्रकारचे खाद्य कोंबडीस दिले जाते.त्यात १६ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध घटक असतात.
  • २१ ते ७२ आठवड्यां दरम्यान निगा – २० आठवड्यांनंतर कोंबडी अंड्यावर आल्यानंतर तिला ‘ लेअर मेश’ प्रकारचे खाद्य दिले जाते. त्यात १८ टक्के प्रथिने व ३.४ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.
कोंबड्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या लसी त्या त्या वेळी देणे गरजेचे असते. त्यामध्ये मेरेक्स, लासोटा, गंबोरी, राणीखेत इ लसींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे अंडी देणा-या कोंबड्यासाठी चोची कापणे व रोग प्रतिकारक लस टोचणे हे ही तितकेच महत्वाचे अस

व्यवस्थापन आणि संगोपन

कुक्कुटपालन हा एक महत्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे. जगात कोंबड्यांच्या एकूण ६६ जाती आहेत. त्यापैकी भारतात १८ जाती आढळून येतात. भारत हा अंडी उत्पादन करणारा जगात पाचवा तर मांस उत्पादनात जगात नववा देश आहे. कुक्कुट पालन हा व्यवसाय भूमिहीन मजुरांसाठी दुय्यम उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय पारंपारिक तसेच व्यावसाईक अशा दोन्हीही पद्धतीने करता येतो.
खाद्य व्यवस्थापन 
संतुलित खाद्य, रोग प्रतिबंधात्मक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सूत्रांच्या आधारे कोंबड्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या व्यवस्थापनाचे तीन टप्पे पडतात.
  • लहान पिलांची निगा राखणे (एका दिवसापासून सहा आठवड्यांपर्यंत) - या प्रक्रियेला बृडींग असे म्हणतात. या दरम्यान ‘चीकमेश’ प्रकारचे खाद्य पिलांस दिले जाते. त्यात २२ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध पदार्थांचे प्रमाण असते.
  • ६ आठवड्यांपासून २० आठवड्यांपर्यंतची निगा - या कालावधीत शरीर वाढीसाठी ‘ग्रोअर मेश’ प्रकारचे खाद्य कोंबडीस दिले जाते.त्यात १६ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध घटक असतात.
  • २१ ते ७२ आठवड्यां दरम्यान निगा – २० आठवड्यांनंतर कोंबडी अंड्यावर आल्यानंतर तिला ‘ लेअर मेश’ प्रकारचे खाद्य दिले जाते. त्यात १८ टक्के प्रथिने व ३.४ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.
कोंबड्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या लसी त्या त्या वेळी देणे गरजेचे असते. त्यामध्ये मेरेक्स, लासोटा, गंबोरी, राणीखेत इ लसींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे अंडी देणा-या कोंबड्यासाठी चोची कापणे व रोग प्रतिकारक लस टोचणे हे ही तितकेच महत्वाचे असते.

बांबूचे महत्व

बांबू पश्चिम घाटातील जंगलात सातपुडा तसेच विदर्भातील जंगलात नैसर्गिकरित्या वाढलेला आढळून येतो. परंतु याची लागवड शास्त्रोक्त  पद्धतीने करणे जरुरीचे आहे. कारण बांबूस बाजारात चांगली मागणी असून चांगला भाव देखील मिळतो. बांबू हे बहुविध उपयोगी असल्याने शेतकऱ्यांसाठी हे पिक उत्पन्नाचे हुकमी साधन ठरू शकते.
पडीक जमिनीत, कमी कष्टात आणि दीर्घकाळ उत्पन्न देणाऱ्या बांबूची लागवड कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या बच्चे सावर्डेच्या कृष्णाबाई पाटील यांच्याकडे शेती करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता होती. मुले नोकरीला असल्यामुळे घरची शेती पडून राहात होती. या पडीक  जमिनीत जास्त कष्ट न करता कमी मनुष्यबळात येणाऱ्या बांबूची लागवड करण्याचे त्यांनी ठरवले. मग जानेवारी महिन्यात एक एकरांवर १० फूट बाय ४ फूटांवर घन पद्धतीने बांबू लागवड केली. दहा  महिन्यात हे बांबू ५ ते १५ फूटांपर्यंत उंच झालेत.

कृष्णाबाईंप्रमाणं कुंभोजच्या शितल कटकळेंनीदेखील २८ जुलैला १ एकरावर १० फूट बाय ४ फूटांवर बांबू लागवड केली. यासाठी त्यांनी उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली. बांबूला नियमित पाण्याची गरज असल्याने त्यांनी बांबूला ठिबक सिंचन केले आहे. यामुळे नियमित खते आणि पाणी देणे सोपं झालेलं आहे. त्या दररोज बांबूंना प्रतिरोप ४ लीटर पाणी देताहेत. अवघ्या चार महिन्यात या बांबूंची तीन ते सहा फुटांपर्यंत वाढ झाली आहे.

बांबू लागवडीसाठी कंद किंवा बियांपासून रोप तयार  केली जातात. आता उतिसंवर्धन पद्धतीने बांबू लागवड यशस्वी ठरतेय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगल्यातील ग्लोबल कुलिंग फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेने यासाठी पुढाकार घेतलाय. बिमा बांबूची टिशूकल्चर बांम्बोसा बल्कोवा वाणाची रोपे त्यांनी विक्रीस ठेवली आहेत. बांबू लागवडीसाठी एकरी लाख रुपयांचा खर्च येतो. एक एकरात १ हजार रोपांची लागवड केली जाते. यासाठी प्रतिरोप ३५ ते ५० रुपयांप्रमाणे ३५ ते ५० हजार रुपये खर्च येतो. तर ठिबक, खतं आणि लागवड खर्च मिळून लाख ते सव्वा लाख रुपये लागतात. त्यानंतर सलग तीन वर्षे केवळ खतं, पाणी आणि बांबू तोडणीच्या मजुरीसाठी ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. तीन वर्षानंतर दरवर्षी ३५०० ते ४००० बांबूंचे उत्पादन मिळते. यापासून बांबूच्या सध्याच्या ४० ते ४५ रुपये नगाच्या दरानुसार दीड लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. बांबूपासून १०० वर्षांपर्यंत उत्पादन घेता येणार आहे. विशेष म्हणजे बांम्बोसा बल्कोवा वाणाच्या बांबूला बाजूला फांद्या आणि काटे येत नाहीत. त्यामुळे याचा आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होतो.

दिवसेंदिवस बांबूची मागणी वाढत आहे. खेळणी, बांधकामापासून ते ऊर्जानिर्मितीसाठी बांबूचा वापर वाढलाय. इकोफ्रेंडली बांबूचा वापर आता धातू, आणि शोभेच्या वस्तूंमध्येही वाढला आहे. त्यामुळं पाण्याची सोय असल्यास कमीत कमी मजुरांची गरज असणारे आणि दीर्घकाळ उत्पादन देणारे बांबूचे पीक घ्यायला काहीच हरकत नाही...
प्रमुख प्रकार – लांबी व गोलाई यांवरून बांबूचे प्रकार पडले आहेत. ते पुढीलप्रमाणे.
  • कळक 
  • मेज 
  • चिवा 
  • चिवारी 
  • हुडा बांबू 
  • मोठा बांबू 
  • पिवळा बांबू 
बांबूचे चार भाग पडतात - 
  1. कंद – बांबूच्या खोडाचा काही भाग जमिनीखाली वाढतो त्यास कंद म्हणतात.
  2. मुळ्या – जमिनीत वाढणाऱ्या कंदास मुळ्या फुटतात.
  3. बांबू – जमिनीवर वाढणाऱ्या सरळ काष्ठमय खोडस बांबू म्हणतात.
  4. पाने व फांद्या.
बांबू लागवडीचे प्रकार - 
  1. कंद लावणे.
  2. कांड्या लावणे.
  3. बियांपासून रोपे तयार करणे.
लागवडीची पद्धत - 
निचरा होणाऱ्या जमिनीत ५ × ५ मी. अंतरावर ६० × ६० से. मी. आकाराचे खड्डे खोदून लागवड करावी.
उपयोग -
बांबू हे गरीबांचे लाकूड म्हणून संबोधले जाते. अन्न, वस्त्र, निवारा आणि उपजीविकीचे साधन अशा अनेक प्रकारे बांबू उपयोगी पडतो.
  1. घरबांधणी.
  2. शेती अवजरांसाठी.
  3. चटाया, हारे, टोपल्या तयार करण्यासाठी.
  4. जनावरांना चारा.
  5. कागदाचा लगदा करण्यासाठी महत्वाचा उपयोग होतो.
उत्पन्न - 
    प्रतिवर्षी ५००० ते ७५०० रुपये इतके उत्पन्न यापासून मिळते.  
 

आले (आद्रक) लागवड, उत्पादन, बेणे साठवण व प्रक्रिया

भारत हा देश फार पूर्वीपासून मसाल्याच्या पिकांचा देश म्हणून ओळखला जातो. मसाल्यांच्या पिकांमध्ये मिरी, दालचिनी, वेलची, लवंग, आले, हळद इ. पिकांना मानाचे स्थान आहे. आले हे देखील एक महत्त्वाचे पीक आहे. भारतामध्ये आल्याचा वापर कमी -जास्त प्रमाणात सर्वत्र केला जातो. त्यामुळे आल्याची लागवड ही जम्मू - काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत केली जाते. आल्याची व्यापारी दृष्टीकोनातून लागवड मुख्यत: केरळ, ओरिसा, मेघालय, पश्चिम बंगाल, अरुणाचाल प्रदेश इ. राज्यामध्ये केली जाते. भारताच्या एकूण उत्पादनाच्या ४०% उत्पादन केरळ व मेघालयात घेतले जाते.

महाराष्ट्रातही आले एका पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी त्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. महाराष्ट्रा प्रामुख्याने सातारा, सांगली, रायगड, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आल्यापासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याचा विचार करता खानदेश व विदर्भातही या पिकाखालील क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे.

आयुर्वेदिक गुणधर्म : आल्याचे आयुर्वेदातील स्थान महत्त्वाचे आहे. आल्याचा वापर मुख्यत: सर्दी, खोकल्यावरील औषधे तसेच पेय बनविण्यासाठी, जैविक किटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे आल्याचे महत्त्व दिवसेंदिवास वाढतच आहे.

आल्याचा वास व तिखटपणा आल्हाददायक असतो. आले पाचक असल्याने अनेक पदार्थात आल्याचा उपयोग करतात. आल्याचा किंवा सुंठीचा काढा पाच मिनिटे पाण्यात उकळून करतात. या उष्ण पेयामुळे रक्ताभिसरणात सुधारण होते. सर्दी, पडसे नाहीसे होते. डोकेदुखी थांबते. आल्यात जंतुनाशक व उत्तेजक गुणधर्म आहेत. आल्याच्या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यात व कन्फेक्शनरीमध्ये होतो. अतिसारावर आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा. आल्याचा रस व मध सम प्रमाणात बाटलीमध्ये साठवून २ -२ चमचे २ वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात. अजीर्ण झाल्यास आल्याचे रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते. आल्याचे सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. पोटदुखी व मळमळ ह्या विकासात उपयोगी आहे. आल्यामुळे चहा सुगंधी व स्वादिष्ट बनतो. त्यातील निकोटीनचे प्रमाण कमी होते.

हवामान : आल्यास उष्ण व दमट हवामान मानवते, पण जेथे ओलीताची सोय आहे अशा उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड यशस्वी करता येते. समुद्रसपाटीपासून ते १५०० मीटर उंचीपर्यनच्या प्रदेशात आले चांगले येऊ शकते.

तापमानाचा विचार करता आले लागवडीच्या कालावधीतील एप्रिल - मे ३० डी. ते ३५ डी. से. तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होण्यासाठी उत्तम असते. आल्याच्या वाढीसाठी सरासरी २० डी. ते ३० डी. से. तापमानाची आवश्यकाटा असते. थंडीच्या दिवसातील कोरडे व थंड हवामान जमिनीतील कंद उत्तम प्रकारे पोसण्यासाठी अनुकूल असते. या पिकास लागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी १५० ते ३८० सें. मी. पाऊस पुरेसा ठरतो. जास्त पावसाच्या प्रदेशात विशेषत: कोकणात हे पीक पावसाच्या पाण्यावरही घेतले जाते. परंतु जमिनीमध्ये पाणी साठून राहिल्यास याचे कंद कुजण्यास सुरुवात होते, म्हणून जास्त पावसाच्या प्रदेशात पाण्याचा उत्तम निचरा होणे आवश्यक आहे. साधारणत: २५% सावलीच्या ठिकाणी आल्याचे पीक उत्तम येते. परंतु आल्याच्या पिकास दिवसाचा सुर्यप्रकाश जास्त मिळाल्यास आल्याचा सुवास कमी होतो, असे प्रयोगांती आढळून आले आहे.

जमीन : आल्यास चांगली निचरा होणारी मध्यम प्रतीची भुसभुशीत, कसदार जमीन मानवते. नदीकाठची गाळाची जमीनदेखील कंद वाढण्याच्या दृष्टीने योग्य आहे. हलक्या जमिनीत भरपूर शेणखत व कंपोस्ट खत घातल्यास तसेच हिरवळीच्या खताचे पीक घेतल्यास हे पीक चांगले येते. आले लागवडीसाठी जमिनीची खोली कमीत - कमी ३० सें.मी. असावी. या पिकाच्या लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात. कोकणातील जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीत तसेच तांबड्या पोयाट्याच्या जमिनीत या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. या पिकासाठी किंचीत आम्लयुक्त सामू असलेली जमिन (सामू ६.५ ते ७) मानवते. कंदवर्गीय पीक असल्यामुळे कंदाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीत हवा खेळती राहणे गरजेचे असते. चुनखडक असलेला जमिनीत पीक चांगले येते, परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. जमीन निवडताना त्यामध्ये लव्हाळा, हराळी, कुंदा इत्यादींसारखा बहुवार्षिक तणांचा प्रादुर्भाव नसावा.

जाती : आले हे जमिनीत वाढणारे खोड असून त्यावर प्रक्रिया करून ते वापरले जाते.

सुंठनिर्मितीसाठी : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड,कुरूप्पमपाडी.

आले : रिओ - डी -जानिरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.

तेल : बाष्पशील असलेल्या तेलाचे जास्त प्रमाण असणार्‍या जाती : स्लिवा स्थानिक, नरसापटलाम, एरनाड, चेरनाड, हिमाचल प्रदेश.

जास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ - डी - जानिरिओ.

तंतूचे प्रमाण कमी असणार्‍या जाती : जमैका, बँकॉक, चायना.

आल्यामध्ये प्रचलित अशा प्रमुख जाती मुख्यत: ज्या भागात ते पिकवले जाते, त्या भागाच्या नावावरून ते ओळखले जाते. उदा.

आसाम : थिंगपुई, जोरहाट, नादिया, थायलंडीयम मरान.

वेस्ट बेंगॉल : बुर्डवान.

केरळ : वैनाड स्थानिक, वायनाड, मननतोडी, एरनाड, थोडूपुझा, कुरूप्पमपाडी.

कर्नाटक : करक्क्ल.

आंध्रप्रदेश : नरसपटलम

महाराष्ट्र : रिओ - डी - जानिरिओ, माहीम, स्थानिक, या नावाने ओळखले जाणारे आले घेण्यात येते. तर काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओडी जानरो, चायना, जमेका या जातींचा समावेश होतो. यापैकी प्रमुख जातींची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे.

१ ) वरदा : ही जात भारतीय मसाला पिकाचे संशोधन केंद्र, कालिकत येथून १९९६ साली प्रसारित केली आहे. ही जात तयार होण्यास २०० दिवस लागतात.या जाती प्रति हेक्टरी २२.३ टन उत्पादन मिळते. या जातीमध्ये तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० % आढळते. या जातीस सरासरी ९ ते १० फुटवे येतात. ही जात रोग व किडीस सहनशील आहे. सुंठेचे प्रमाण या जातीमध्ये २०.०७% आढळते.

२) महिमा : ही जात सुध्दा कालिकत येथील संशोधन केंद्रातून २००१ साली विकसित करून, प्रसारीत केली आहे. याही जातीला तयार होण्यास २०० दिवस लागतात. या जातीपासून सरासरी प्रती हेक्टरी २३.२ टन उत्पादन मिळते. या जातीमध्ये तंतुचे प्रमाण ३.२६ % असते.

या जातीस सरासरी १२ ते १३ फुटवे येतात. हि जात सुत्रकृमीस प्रतिकारक आहे. सुंठेचे प्रमाण १९ % आढळते.

३) रीजाथा : ही जात मसाला पिकाचे संशोधन केंद्र, कालिकत येथून २००१ साली प्रसारीत केली आहे. या जातीमध्ये तंतुचे प्रमाण ४% असून सुगंधी द्रव्याचे प्रमाण सर्वात जास्त २.३६% आहे.

ही जात तयार होण्यास २०० दिवस लागतात, तर सरासरी उत्पन्न प्रति हेक्टरी २२.४ टन मिळते. या जातीस ८ ते ९ फुटवे येतात. या जातीमध्ये सुंठेचे प्रमाण २३% आहे.

४) माहीम : ही जात महाराष्ट्रामध्ये प्रचलित असून बहुतेक सर्व जिल्ह्यामध्ये ही जात लागवडीस योग्य आहे. ही जात मध्यम उंचीची, सरळ वाढणारी आहे. या जातीस ६ ते १२ फुटवे येतात . ही जात तयार होण्यास २१० दिवस लागतात. तर हेक्टरी सरासरी उत्पादन २० टन मिळते. या जातीमध्ये सुंठेचे प्रमाण १८.७% आहे.

आल्याच्या सुधारीत जाती :

१) सुप्रभा : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली आहे. या जातीच्या झाडाला भरपूर फुटवे असतात. गड्डे जाड असतात आणि त्यांची टोके गोलाकार असतात. साल चमकदार करड्या रंगाची असते. तंतू ४.४%, सुगंधी तेल १.९% व ओली ओरेझीन ८.९% असते. हिरव्या आल्यासाठी व सुंठीसाठी ही योग्य जात आहे. प्रति हेक्टरी ३.४० टन उत्पादन मिळते.

२) सुरुची : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली आहे. गड्डे हिरवट पिवळ्या रंगाचे असतात. ओरेझीन १० % असते. प्रती हेक्टरी २.२७ टन उत्पादन मिळते.

3) सुरभी : स्थानिक जातीचे कंदावर 'एक्सरे' ची प्रक्रिया करून ही जात निवडलेली आहे. गड्ड्यांचा आकार सिलेंडर सारखा असतो. साला गर्द चमकदार असते. भरपूर फुटवे असतात. तंतू ४%, तेल २.१% असते. प्रति हेक्टरी उत्पादन ४ टन मिळते.

वरील सुधारीत जाती मिळण्याचा पत्ता : Director central Plantaiton Crops Research Institute, Post Kudly, Kasaragod (Kerala).

पुर्वमशागत : आल्यासाठी १ फुटापर्यंत खोल उभी व आडवी नांगरट करून १ ते २ कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.

आल्याचे पीक जमिनीत १८ महिन्यापर्यंत राहू शकत असल्यामुळे आणि या पिकास लागणार्‍या भुसभुशीत जमिनीमुळे जमीनीच चांगली पूर्व मशागत करणे गरजेचे आहे. शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे, तसेच जमीनतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड - गोटे वेचून काढावेत.

आले लागवडीच्या पद्धती : जमिनीच्या प्रकारानुसार तसेच स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार आले लागवडीची पद्धत वापरावी. या पिकाची लागवड प्रामुख्याने सपाट वाफे, सारी वरंबा पद्धत आणि रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर केली जाते.

१) सपाट वाफे पद्धत : पठारावरील सपाट जमिनीवरती जेथे पोयटा किंवा वाळू मिश्रीत जमीन आहे. अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करतात. त्यासाठी जमिनीच्या उतारानुसार २ x १ मी. किंवा २ x ३ मी. चे सपाट वाफे तयार करून घ्यावेत. सपाट वाफ्यामध्ये आल्याची लागवड २० x २० सें. मी. किंवा २२.५ x २२.५ सें. मी. अंतरावरती करावी की, जेणेकरून प्रति हेक्टरी रोपांची संख्या दोन लाखाच्या दरम्यान राहील.

२) सरी वरंबा पद्धत : मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी. या पध्दतीमध्ये लाकडी नांगराच्या सहाय्याने ४५ सें.मी. वरती सर्‍या पाडून घ्याव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून २ इंच खोल आल्याची लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.

३) रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत : महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीत किंवा आधुनिक सिंचन पद्धत जसे तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते. वरील पद्धतीपेक्षा या पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २०% उत्पादन जास्तीचे मिळते. जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गाडी वाफ्याची) लांबी ठेवावी. १३५ सें.मी. वरती सारी पाडून घ्यावी, म्हणजे मधील वरंबा ९० सें.मी. रुंदीचा होईल. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ४५ सें.मी. सोडावी. या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्याच्यावरती २२.५ x २२.५ सें.मी. वरती लागवड करावी.

लागवडीचा हंगाम आणि लागवडीची वेळ : ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आल्याची लागवड १४ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. त्यानंतर मात्र आल्याची लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येतो.

सातारा जिल्ह्यात शेतकरी आल्याची लागवड साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात करतात. अहमदनगर जिल्ह्यात मे चा दुसरा आठवडा लागवडीसाठी योग्य असल्याचे प्रयोगाअंती दिसून आले आहे. आले उगवणीसाठी उष्ण हवा, वाढीसाठी उष्ण व दमत हवा लागत असल्याने पावसानंतर कीड जास्त पडत असल्याने आल्याचे पीक पावसाअगोदर उगवून स्थिर होईल अशा दृष्टीने लागण केली जाते.

लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत. बियाणे निवडतान कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. तसेच लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्थ संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे. लागवडीसाठी २५ क्विंटल / हेक्टरी आले बियाणे लागते. लागवडीच्या वेळेपर्यंत या बियाण्याच्या वजनात घट होवून साठवणुकीच्या पध्दतीनुसार त्याचे वजन १५ ते १८ क्विंटल भरते. आल्याची लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजुला असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढही चांगली होते. याउलट जर डोळा खाली आणि आतल्या बाजुला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावे. लागवडीच्यावेळी कंद पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.

बीजप्रक्रिया : जमिनीत लावलेले बेणे सोडू नये, म्हणून बीजप्रक्रिया करावी लागते. मऊसड (सॉफ्ट रॉट). यामुळे बेणे सडण्याचा संभव असतो. त्यासाठी १०० लि. पाण्यामध्ये १ लि. जर्मिनेटर आणि ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट घेऊन त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बेणे बुडवून ठेवावे. नंतर पाणी निथळून ते बेणे लावणीसाठी वापरावे. साधारणपणे बेणे ३० ते ३५ दिवसात उगवते, पण जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे १८ -१९ दिवसात उगवते.

सेंद्रिय खते : मध्यम ते हलक्या जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत वरीलप्रमाणे टाकून कल्पतरू सेंद्रिय खत लागणीपुर्वी एकरी ५० किलोच्या २ ते ३ बॅगा आणी लागणीनंतर २ ते २।। महिन्याने उटाळणीच्यावेळी एकरी ५० किलो आणि त्यानंतर २।। ते ३ महिन्यांनी पुन्हा ५० किलो कल्पतरू खत द्यावे. जमीन भारी असेल तर लागणीपुर्वी २ बॅगा आणि २।। ते ३ महिन्यांनी १ ते २ बॅगा द्याव्यात. त्यानंतर २ ते २।। महिन्याने १ म्हणजे आल्याची वाढ, फणीचे पोषण चांगल्या प्रकारे होऊन आले लागण्याचा प्रादुर्भाव कमी होतो.

तणनाशकाचा वापर : आले पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. शेणखतात तणांचे बी असल्यामुळे आले लागवडीनंतर दुसर्‍या ते तिसर्‍या दिवशी जमीन ओलसर असताना अेट्राझीन हे तणनाशक एक लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ ग्रॅम घेवून फवारणी करावी. त्याचाप्रमाणे लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ग्लायफोसेट १ लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ मिली घेवून फवारणी केल्यास पहिली फवारणी करूनसुध्दा त्यातून उगवलेल्या तणांचा नायनाट होतो.एकदा आले उगवण्यास सुरुवात झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा.

पाणी व्यवस्थापन : आले पिकाची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती केली जाते, तर कमी पावसाच्या प्रदेशाच्या मात्र पाणी देण्याशिवाय पर्याय राहत नाही. आल्याची लागवड एप्रिल -मे महिन्यात करत असल्यामुळे पावसाची सुरवात होईपर्यंत सुरूवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसर्‍या - चौथ्या दिवशी लगेच द्यावे. पावसाळ सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसामध्ये १०ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे. हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

आधुनिक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे झाल्यास तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या पद्धतींचा अवलंब करावा. गादीवाफा पद्धतीने या पिकाची लागवड करावी, एका गादीवाफ्यावर दोन ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकाव्यात आणि २ लि. / तास एवढेच पाणी देणार्‍या तोट्या बसवाव्यात. जमिनीच्या मगदुरानुसार हा संच सुरुवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ - संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.

आंतरमशागत : तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्या वेळी चेणारी तणे खुरपणी करून काढून टाकावीत. आले पिकत उटाळणी करणे ही गरजेचे असते. त्यामध्ये लांब दांड्याच्या खुरप्याने माती हलवली जाते. त्यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतुमयमुळे फुटतात. आले पिकांमध्ये उटाळणी पीक २.५ ते ३ महिन्याचे असताना करावे. या पिकास ६ व्या ते ७ व्या महिन्यात फुले येतात त्यास 'हुरडे बांड' असे म्हणतात. उशीरात उशीरा उटाळणी हुरडे बांड येण्यापूर्वी करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून फण्यांची वाढ होण्यात सुरुवात होते. उटाळणी केली नाही तर उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के घट येते. उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.

आंतरपिके : आल्याचे पीक २५ % सावलीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. त्यामुळे हे पीक नारळ, सुपारी, कॉफी इत्यादीच्या बागेमध्ये घेतल्यास उत्पादनात वाढ होते.आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू मिरची,,तूर गवार यासारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

संजीवकांचा वापर : आल्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच आल्यामधील तंतुचे प्रमाण कमी करण्यासाठी २% युरिया आणि ४०० पी. पी. एम. प्लॅनोफिक्सचे मिश्रण लागवडीनंतर ६० आणि ७५ व्या दिवशी फवारावे. तसेच फुटव्यांची संख्य वाढण्यासाठी २०० पी. पी. एम. इथ्रेलची ७५ व्या दिवसापासून १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.
कीड व रोग नियंत्रण :

१) कंदमाशी : या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाया शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात. अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजिवीका करतात.

याचे नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागल्यावर माशा मारण्यासाठी क्किनॉलफॉस २५ % प्रवाही २० मि. ली. १०० लिटर पाण्यामध्ये किंवा डायमेथोएट १५ मि. ली. प्रती १० लि. पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान आलटून - पालटून १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. त्यानंतर क्किनॉलफॉस ५ % किंवा फोरेट १० % दाणेदार हेक्टरी २५ किलो याप्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरून टाकावे व पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे. याच किटकनाशकाचे पुढील दोन हप्ते १ महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत. अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीत झाकून घ्यावेत.

२) पाने गुंडाळणारी अळी : आले पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते.

किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.

३) खोड पोखरणारी अळी : ही कीड मुख्यत: जुलै ते ऑक्टोबर या काळामध्ये आढळते. या किडीची अळी छोट्या खोडाला छिद्र करते आणि त्यावर उपजिवीका करते. त्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरुवात होते. अळीने पडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो.

या किडींच्या नियंत्रणासाठी एक महिन्याच्या अंतराने १.५ मिली मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात किंवा १.५ मिली मोनोक्रोटोफॉस याची फवारणी आलटून पालटून करावी.

सुत्रकृमी : काही भागामध्ये आले पिकावर सुत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सुत्रकृमी हे पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच त्यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशीचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्यावेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून घ्यावा किंवा फोरेट १० जी हेक्टरी २४ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते २० क्विं./ हे. निंबोळी पेंडीचा वापर करावा.

रोग नियंत्रण :

१) कंदकूज : आले तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त परमाणात दिसून येतो. प्रथम पानांच्या शेंड्यावरून व कडांनी पिवळे पडून झाड खालीपर्यंत वाळले जाते. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाणा वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पिथीयम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.

या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करताना निरोगी बियाण्याचा वापर करावा. जमिन हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचर्‍याची निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेवून पाण्याचा निचरा करून घ्यावा. तसेच मेटॅलॅक्सिल ८ टक्के + मॅकोझेब ६४ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेन्डेझिम ( ५० डब्ल्यु. पी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करवी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून घ्यावा.

२) पानावरील ठिपके : या रोगाची सुरुवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानावर पसरतो. या रोगामध्ये असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात. रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येवून संपूर्ण पान करपते.

याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५, १० लिटर पाण्यात २५ ते ३० ग्रॅम किंवा बाविस्टीन १० लिटर पाण्यात १० ते १५ ग्रॅम किंवा १ टक्के बोडोंमिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितिनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्या करव्यात. वरील औषधांच्या आलटून- पालटून फवारण्या कराव्यात एकच औषध सतत फवारणीसाठी वापरू नये.

फवारणी : वरील सर्व किडी व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि उत्पादन अधिक व दर्जेदार मिळावे म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (बेणे उगवल्यानंतर २१ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (४५ ते ६० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ६०० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (७५ ते ९० दिवसांनी ) : थ्राईवर ६०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० ते ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौठी फवारणी : (१२० दिवसांनी ): थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १.५ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० ते ६०० मिली + ३०० लि. पाणी.

आल्याची काढणी करेपर्यंत दर महिन्याला फवारणी क्र. ४ प्रमाणे फवारणी करावी. म्हणजे आल्याच्या फण्यांची फुगवण,वाढ चांगली होऊन दर्जात वाढ होते. तसेच आले लागू नये याकरीता दर महिन्याला जर्मिनेटर १ लि. आणि कॉपरऑक्झीक्लोराईड १ किलो + हार्मोनी ५०० मिली प्रति एकरी २००लि. पाण्यातून सोडावे.

हवामानातील फेरबदल, पाणी, खतांचे नियोजन आल्याच्या लागवडीचा हेतू (मार्केट, बेणे, प्रक्रिया उद्योग इत्यादी) लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र अथवा मुख्य कार्यालयाशी संपर्क करून तज्ज्ञांकडून माहिती घेऊनच सर्व व आवश्यक असल्यास पुढील अधिक अथवा कमी जास्त फवारण्यात घ्याव्यात कारण आले हे पीक साधरण १२ ते १८ महिने जमिनीत राहते.

काढणी आणि उत्पादन : आले पीक ७५ टक्के परिपक्क झाल्यानंतर काढणी केली तरी मार्केटला विक्रीसाठी चालते. हिरवे आले म्हणून वापरावयाचे असल्यास पिकाची काढणी ६ महिन्यांनी करता येते. आल्याची विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागणीनंतर आठ महिन्यानंतर पुढे आल्याची काढणी करावी.

बाजारातील मागणीप्रमाणे आल्याची काढणी करावी. गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आल्याचा पाला कापून गड्डे. बोटे (नवीन आले) काढणीनंतर वेगळे करावे. काढणीनंतर आल्याचे कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत आणि बाजारात पाठवावे.

प्रति हेक्टरी ओल्या आल्याचे सरासरी उत्पादन १८ ते ३० टनापर्यंत हेते.

द्विहंगामी पीक : अत्तम निचर्‍याची जमीन असेल तर हेच आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून आल्याचे द्विहंगामी पीक घेता येते आणि याचे उत्पन्न पहिल्या वर्षापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दीडपट ते दुप्पट मिळते आल्याची पाने सुकल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी या पिकास पाणी द्यावे.

साधारणत: अडीच ते तीन महिन्यानंतर पुन्हा नवीन फुटवे फुटु लागतात.

आल्याचे बेणे कसे साठवावे.

आल्याची लागवड बेण्यापासून कंदापासून करतात, कारण बियापासून लागवड करता येत नाही. आल्याचे भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी बेणे निरोगी असावे लागते. सामान्यपणे आल्याची काढणी डिसेंबर महिन्यात होते आणि पुढील हंगामातील लागवड एप्रिल - मे महिन्यात होते. तोपर्यंत म्हणजे ४ ते ५ महिने साठवून ठेवावे लागते. या काळात बेण्यातील बाष्पीभवन होऊन बेणे आकसते आणि बुरशीमुळे सडते. परंतु बेण्याची योग्य पद्धतीने साठवण केल्यास ही समस्या राहत नाही. साठवणुकीत बेण्याचे नुकसान होऊ नये म्हणून निरोगी प्लॉटमधून आल्याचे पुर्ण पक्क झालेले कंद निवडावेत.

बेणे साठवण्याची पद्धत : सामान्यपणे शेतकरी खोलीच्या कोपर्‍यात किंवा छ्प्परात तळाशी वाळूचा पातळ थर देऊन त्यावर बेण्याचा ढीग करतात आणि तो ढीग वाळलेल्या पानांनी झाकतात. काही शेतकरी मोठ्या झाडाच्या सावलीत खड्डा करून त्यात बेणे साठवतात. काही शेतकरी आल्याची काढणी करण्याचे वेळी शेताचा काही भाग काडणी न करताच सोडतात महणजे त्या भागातील आल्याचे कंद काढत नाहीत. पुढील हंगामात लागवडीच्या आधी हे कंद काढून बेण्यासाठी वापरतात. काही शेतकरी बेणे साठविण्यापूर्वी शेणकाल्यात बुडवून काढतात.

बेण्याच्या साठविण्याची पध्दत बेण्याच्या आकारमानाप्रमाणे जमिनीत आवश्यक लांबीचा व रुंदीचा खड्डा खणावा. त्याची खोली मात्र ६० सेंमी ठवावी. ४५ x ४५ x ६० सेंमी आकाराच्या खड्ड्यात २० ते २५ किलो बेणे साठविता येते. खड्ड्याच्या भिंती व तळ शेण व मातीच्या मिश्रणाने सारावाव्यात. त्याप्रमाणे तयार झालेला खड्डा १० ते १५ दिवस वाळू द्यावा.

खड्ड्याच्या तळावर कोरड्या वाळूचा २ सेंमी जाड थर पसरावा. या थरावर बेण्याचा १० सेंमी जाडीचा थर पसरावा. याप्रमाणे बेण्याचा थर व त्यावर वाळूचा थर असे आलटून पालटून खड्ड्यात तळापासून ४५ से ५० सेंमी उंचीपर्यंत थर भरावेत. खड्ड्यावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे. ही फळी व बेण्याचा थर यामध्ये १० सेंमी खोल मोकळी जागा ठेवावी. खड्ड्यातील बेण्याला हवा मिळविण्यासाठी फळीला मधे भोक ठेवावे. खड्ड्यावर वाळलेल्या गवताचे छप्पर तयार करावे. त्यामुळे अकाली पावसापासून बेण्याचे संरक्षण होते.

बेण्याची साठवण : बेण्यासाठी ठेवावयाचे आले काढणीनंतर असणार्‍या जाड मुळ्या तोडून सावलीत हवेशीर ठिकाणी रचून साठवण करावी. परंतु या पद्धतीने वजनामध्ये २५ ते ३० % घट येते. त्यामुळे आले काढल्यानंतर चांगले निवडलेल्या गड्डे बेण्यावर क्किनॉलफॉस २५ ई.सी. २० मि.ली. आणि कार्बेन्डेझिम ५० डब्ल्यू पी. १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेवून त्यात १० ते १५ मीटर बुडवावेत, त्यांनतर ते सावलीत सुकवावे.

अशा प्रकारे प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चार खणून किंवा खड्ड्यात केली असता त्याची उगवण क्षमता चांगली राहते. त्यासाठी सावलीत आपल्या बियाण्याच्या गरजेनुसार आवश्यक तेवढ्या लांबी रुंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा काढावा.

खड्डा खोदताना त्या जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा खोल आहे. याची खात्री करून घ्यावी. खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा अगर वाळलेले गवत टाकावे. अशा खड्ड्यामध्ये बियाण्याची साठवण करावी. खड्ड्याच्या तोंडावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे व त्यास हवेसाठी छिद्र ठेवावे. खड्ड्यातील आले व फळी यामध्ये अंतर सोडावे की जेणेकरून खड्ड्यात हवा खेळती रहावी. अशाप्रकारे साठविलेल्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहते. पत्र्याची सिमेंट, अगर कौलारू बंद खोली बेणे साठवणीसाठी वापरू नये. अडीच ते तीन महिन्यात आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब आलेले आले बेण्यासाठी वापरावे.

आले कंदाचे सरासरी उत्पन्न १५ ते ३० टन प्रती हेक्टर इतके येते. महराष्ट्रात माहिम या जातीचे चांगले उत्पन्न मिळते.

काढणी केल्यानंतर आले पुढीलप्रमाणे करून साठवणूक करता येते.
१) वाळलेले आले

२) सुंठ

३) आल्याची पावडर

वाळलेले आले किंवा सुंठ तयार करावयास वापरावयाचे आले, पीक परिपक्व झाल्यानंतरच काढणी करावी. ते पुर्ण वाढलेले निरोगी असावे. कुजके, सडलेले अपरिपक्व आले सुंठीसाठी वापरू नये. त्याचाप्रमाणे सुंठीसाठी वापरावयाचे आले अधिक तंतुमय असू नये, सुंठ तयार करण्यासाठी जमेका, चायना, रिओडी जानेरो, माहिम यासारख्या कमी तंतुमय असणार्‍या जातीचा वापर करावा. याच्यापासून उत्तम प्रतिची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो.

वाळलेले आले : वाळलेले आले तयार करण्यासाठी प्रथम आले चांगले स्वच्छ धुवून घ्यावे, ते मुळ विरहित असावे. स्वच्छ पाण्यामध्ये एक रात्रभर भिजवून ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्याच्यावरील साल बाबुंच्या टोकदार कडाने चिवट्याने खरडून काढावी. परत एकदा स्वच्छ पाण्यात आले धुऊन काढावे. हे साल काढलेले आले ७ ते ८ दिवस उन्हात चांगले वाळवावे. वाळवताना एक ते दीड इंचापेक्षा जाड थर देऊ नये. तसेच आले सुकविणेसाठी स्वच्छ प्लॅस्टिकचा किंवा ताडपत्रीचा वापर करावा. वाळविताना वरचेवर हात घ्यावा. सायंकाळी पसरलेले आले गोळा न करता ताडपत्रीने झाकुन घ्यावे, म्हणजे धुराने काळपट पडणार नाही. आल्यातील पाण्याचा अंश आठ ते दहा टक्क्यापर्यंत कमी आल्यानंतर आले पुर्ण वाळले असे समजावे. पुर्ण वाळल्यानंतर परत एकदा हाताने चोळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या आल्यास वाळवलेले आले किंवा चुन्याची प्रक्रिया न केलेले आले म्हणतात. असे आले थंड आणि कोरड्या जागेत साठवावे. वाळलेल्या आल्याचे उत्पन्न ओल्या आल्याच्या २० ते २५% इतके असते. हे उत्पन्न आल्याच्या वाणानुसार बदलते.

सुंठ तयार करण्याची मलबार पद्धत : या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी प्रथम आले स्वच्छ निवडून ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर त्याची साल काढून घ्यावी. साल काढलेले आले २% चुन्याच्या द्रावणात ६ ते ७ तास भिजत ठेवावे. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्या बंद खोलीत पसरून ठेवताना बंद खोलीत आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देतात थोडक्यात बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. साधारणत: १ किलो कंदाला ६ ते १० ग्रॅम याप्रमाणात गंधक जाळावे. त्यानंतर कंद बाहेर काढून २% चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत १२ तास गंधकाची धुरी देतात. अशा प्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढरा शुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सुर्यप्रकाशामध्ये पाण्याचा अंश ८ ते १० % राहीपर्यंत वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.

सुंठ तयार करण्याची सोडा खार मिश्रण पद्धती : या पध्दतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर १.५ x २ फूट आकाराचा हाताने उचलेल इतक्या क्षमतेचा गॅल्वनाईज जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यामध्ये सोडीयम हयाड्राऑक्साईड (कॉस्टीकसोडा) ची २०%, २५% आणि ५०% तिव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणामध्ये कंदाने भरलेला पिंजरा २०% द्रावणामध्ये पाच मिनीटे, २५% द्रावणमध्ये एक मिनीट आणि ५०% द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले ४% सायट्रीक अॅसिडच्या द्रावणात २ तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सुर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. या पध्दतीने तयार केलेल्या सुंठेला बाहेरच्या देशात चांगली मागणी असते. कारण मलबार पध्दतीने तयार केलेल्या सुंठेत कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते.

आल्याची पावडर : चांगले वाळलेले आले घेवून त्याची बारीक पावडर तयार केली जाते. ती पावडर ५० ते ६० मेशच्या चाळीणीमधून चाळून हवा बंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरली जाते. आल्याच्या पावडरीचा मुख्य उपयोग ओलीओरेझीन तसेच तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.

आद्रकाची साल काढण्यासाठी लागणारी उपकरणे: प्रक्रिया करून विविध पदार्थात वापर करण्यासाठी आद्रकाची साल काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आद्रक रात्रभर पाण्यात भिजवून काढल्यानंतर त्याची साल थोडीशी ढिली होते व काढून टाकण्यास फारसे कष्ट पडत नाहीत व त्यासोबत गराचा अंशही खरवडला जात नाही. साल काढण्यासाठी बांबूची धारदार सुरी किंवा स्टेनलेस स्टीलचा चाकू वापरतात. तसेच शिंपले किंवा कोरड्या स्वच्छ खरबडीत कापडासही घासून साल काढतात. यानंतर स्वच्छ धुवून आद्रक ३ ते ४ दिवस कडक उन्हात वाळवितात. वाळलेल्या आद्रकाची पावडर तयार करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी ती वापरतात.
 
भारतातील आल्याचे क्षेत्र, हेक्टरी उत्पादन व एकूण उत्पादनाचा तक्ता (क्र. १)  
वर्ष   क्षेत्र (००० हेक्टर)   एकूण उत्पादन
(००० टन)  
एकूण उत्पादन
(किलो / हे.)  
१९९७ - ९८   ७५ .६   २५२.१   ३,३३५  
१९९८ - ९९   ७७.६   २६३.२   ३,३९२  
१९९९ - २०००   ८०.८   २८२.६   ३,४९८  
२००० -०१   ८६.२   २८८.०   ३,३४१  
२००१ -०२   ९०.८   ३१८.०   ३,५०२  
२००२-०३   ९०.८   ३१७.०   ३,५००  
२००३ - ०४   ८५.१   ३०१.९   ३,५४८  
२००४-०५   ९५.३   ३५९.०   ३,७६७  
२००५-०६   ११०.६   ३९१.०   ३,५३७  
२००६-०७   १०५.९   ३७०.०   ३,४९७  
जगात सर्वात जास्त क्षेत्र म्हणजे अंदाजे जगाज्या एकूण आले लागवडीच्या क्षेत्रापैकी ५५ % क्षेत्र हे एकट्या नायजरीयाचे आहे. जगाचे आल्याचे २००७ मधील एकूण उत्पादन १३,८७,४४५ मेट्रिक टन होते. भारताचे उत्पादन हे जगाच्या ३६% होते, तथापि अमेरिकेच्या तुलनेत ही उत्पादकता फार नगण्य आहे.

जागतिक व्यापार हा साधारण १९ कोटी डॉंलरचा आहे. यामध्ये भारताचा वाटा फक्त ६% आहे. चीनचा वाटा हा ५७% आहे. परंतु आल्याच्या तेल आणि अर्काच्या व्यापारात निर्यातीमध्ये भारताचा वाटा हा सरस असून तो ५० % आहे.

जगातील आल्याचे क्षेत्र व एकून उत्पादन (तक्ता क्र.२) 
वर्ष   क्षेत्र
(००० हेक्टर)  
उत्पादन
(मेट्रीक टन)  
१९९८  ३१२,१०८   ८६४,७६०  
१९९९   ३०८,६३१   ९५२,२२२  
२०००   ३०५,६९६   ९५३,१५२  
२००१   ३१०,९२३   ९८८,९५१  
२००२   ३१७,०९९   १,००७,५०३  
२००३   ३४१,३६०   १,१०९,८३३  
२००४   ३४१,८२९   १,१४१,३१९  
२००५   ३७२,२७१   १,२६४,८९१  
२००६   ४१४,१८३   १,३३७,१८८  
२००७   ४२९,४८१   १,३८७,४४५  



जगभरातून आल्याची निर्यात (तक्ता क्र. ३)  
वर्षं   एकूण निर्यात
(टन)  
किंमत (०००)  
१९९७ -९८   १,७४,१८५   १४२,३१५  
१९९८ - ९९   १५५,९८५   १०७,७८९  
१९९९ -२०००   २०४,०५५   १२२,०८४  
२००० -०१   २४३,१७३   १३१,६३२  
२००२ -०३   २९०,९९२   १२५,९२२  
२००३ -०४   ३११,४०५   १३५,६०३  
२००४ - २००५   २९१,४८४   २७७,६१९  
२००५ -०६   ३७९,६३०   ३१९,४८७  
२००६ -०७   ३८५,४०६   २५३,०९१  


प्रक्रिया केलेले आणि न प्रक्रिया केलेले (Bleached/ Unbleached), स्वच्छ आणि अस्वच्छ (Garabled / Ungarbled) तसेच तुकडा झालेले अशा आल्याचा जागतिक मार्केटमध्ये ५०% वाटा आहे. कोचिंग आले हे जगप्रसिद्ध आहे. जागतिक मार्केटमध्ये आल्याचि भरतातून ३ लाख टन निर्यात केली जाते.

भारतातील आल्याची एकूण निर्यातीची आकडेवारी (तक्ता क्र. ४)  
वर्ष   एकूण निर्यात
(टन)  
किंमत
(लाख रू.)  
१९९७ - १८   २८,२६८   ७,२६२.७३ 
१९९८ -९९   ८,६८३   ४,०५८.3२  
१९९९ - २०००   ८,९२३   ३,२५३.५५  
२००० - ०१   ६,२८८   २,६८२.०५  
२००१ -०२   ६,४६४   २,३११.४७  
२००२ - ०३   ८,४६१   २,३११.४७  
२००३ -०४   ५,०००   २,३४०.५०  
२००४ -०५   १४,९०८.१३   ५,९२९.४०  
२००५ -०६   १०,८९०.४३   ४,५८०.५९  
२००६ - ०७   ९,६६१.३४   ४,७७७.७७  
२००७ - ०८   ८,३३२.९१   ३,२९६.०८  
२००८ - ०९   ३,२२९.७०   १,५८१.७५  
आल्याची उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची दक्षता

१) अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचे निवड करणे.

२) लागवडीचे बेण्याचा वेळेत पुरवठा करणे.

३) उत्पन्नातील घट कमी करणे.

४) हळव्या जातींची निर्मिती करणे.

५) ताज्या आल्यावरील प्रक्रिया उद्योग वाढविणे.

६) सेंद्रिय आल्याची लागवड वाढविणे.

७) आल्यातिल उत्पादन व दर्जाच्या दृष्टीने शेती संशोधन वाढविणे.

भारताला निर्यातीमध्ये चीन, नायझेरिया व करणार्‍या १५ राष्ट्रांबरोबर भारताची निर्यात खालील थायलंडबरोबर स्पर्धा करावी लागते. जागतिक आयात टेबलमध्ये दाखविली आहे.

एकूण   निर्यात (टन) एकूण किंमत (लाख रू.)
२००७ - ०८ २००८ -०९ (एप्रिल - जून) २००७ -०८ २००८ -०९ (एप्रिल - जून)
अमेरिका   ५८८.७६   १०१.७५   ४१९.०२   ६३.६१  
बांगलादेश   ४२५४.०७   १३४६.६२   ४०८.९३   १३७.२४  
युके   ४५९.६०   १३६.०६   ३५४.७६   १२२.८७  
स्पेन   ३०५.२३   १०६.१०  २१०.२०   ११५.४३  
मोरोको   २६९.७९   ६९.००   १९४.८२   ६६.५३  
सौदी अरब   २३४.६५   ९५.८६   १८४.७९   ६०.३९  
जर्मनी   २८२.५७   १९८.५१   १७८.६९   ६६.४५  
ऑस्ट्रेलिया   १९६.२८   २०.७७   १५५.१७   १८.६२  
नेदरलेंद   २०५.५४   ६०.६४   १३९.१७   ४५.९६  
येमेन रिपब्लिक   १८०.४६   ३८.००   १२३.३७   ३६.१९  
जपान   १९७.६९   ९०.०८   १२१.२४   ११६.३२  
मलेशिया   १४४.९४   ४७.४०   ८१.७८   २४.७७  
कॅनडा   ११८.९१   २५.५९   ७९.५८   १६.४३  
बेल्झियम   ७१.६२   २.३८   ७१.८७   २.६९  
इस्त्राइल   ९२.११   ७.००   ७०.०६   ६.६१  

कांदा बीज निर्मितीतून रोजगार व स्वावलंबन

ग्रामीण भागातही महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांची चळवळ खोलवर रुजण्यास मोठया प्रमाणात सुरुवात झाली याचेच उदाहरण नाशिक जिल्हयात रेणुका माता महिला बचतगटांने कांदा बीज निर्मिती प्रकल्प सुरु करुन पहिल्याच हंगामात भरघोस बीज निर्मिर्ती करुन चांगल्या प्रकारे लाभ मिळविला आहे. 
उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात. 

सदर बचतगटास काही तरी उदयोग करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच कालावधीत राज्य सरकारने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नाशिक जिल्हा कार्यालयाकडून बचतगटाच्या विविध उपक्रमाविषयी प्रस्ताव मागविले होते. या महामंडळाने कांदा बीज उत्पादनास प्राधान्य देण्याचें ठरवले. कारण नाशिक जिल्हयात कांदयाची मोठी बाजारपेठ असली तरी दरवर्षी कांदा बीज मिळविण्यासाठी शेतक-यांना नेहमीच अडचण येते. त्यामुळे कांदा बीज हा मुख्य प्रकल्प हाती घेतला. त्यादृष्टीने शहर परिसराचा अभ्यास केला. हा प्रकल्प राबविण्यासाठी जमिनीची आवश्यकता होती. परंतु जमीनीची किंमत लोक अव्वाच्या सव्वा सांगत होते. यावेळी बचतगटाच्या महिलांनी माविमच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक अधिकारी ज्योती निंभोणकर यांची भेट घेतली . त्यांना कांदा बीज शेती करावयाचे सांगितल्यावर ज्योती निभोणकर यांनी नायकवाडी परिसरास भेट दिली. चर्चेच्या अंती या बचतगटाच्या महिला सभासदाची एक एकर ३० गुंठे शेत जमीन कांदा बीज उत्पादनासाठी १० वर्षासाठी भाडे तत्त्वार घेतली. तसेच भाडयापोटी विहिर दुरुस्त करण्याचे देण्याचे ठरले.हा संपूर्ण खर्च एकंदरीत ४० ते ५० हजार रुपयापर्यंत होता. यासाठी माविमने २८ हजार ५०० रुपयांचे कर्ज दिले तर महिलांनी तेरा हजार रुपये जमा करुन एकुण ४५ हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीचा उपयोग कांदा बीज उत्पादनाची सामूहिक शेती करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात येवुन शेतीचा उत्पादन काढण्यासाठी प्रगतीचे पाऊले पडू लागले. 

महत्वाचे म्हणजे कांदा बीज लागवडीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्यासाठी पिंपळगाव येथील द्राक्ष कृषी संशोधन केंद्रास महिलांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले. यास राष्ट्रीय फलोत्पादन विकास व संशोधन प्रतिष्ठानचे सहकार्य मिळाले. या प्रतिष्‍ठानकडून परतीच्या बोलीवर बियाणे घेण्यात आले. गतवर्षी नोव्हेंबर मध्ये कांदा लागवडीस सुरुवात झाली. बचतगटाच्या महिला सदस्यांना या कामासाठी पाठींबा मिळावा यासाठी त्यांच्या पतीची समज काढण्यात आली की यातून मिळणारा पैसा हा घरची आर्थ्रिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणार आहे. त्यानंतर महिलांना घरचा सदर उदयोग करण्यास उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे. 

कांदयाला जेव्हा पालवी फुटली तेव्हा आलेली पालवी काढून टाका म्हणजे नवीन पाने आल्यावर चांगले उत्पादन येते असे मत गावातील मंडळीनी व्यक्त केले. असा गैरसमज पसरवणारा सल्ला समन्वयक ज्योती निभोणकर यांना समजल्यावर त्यांनी महिलांची बैठक घेऊन कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कांदयाची पाने कापणे चुकीचे व अत्यंत धोकादायक असल्याचे स्पषट केले. कोणाचे ऐकण्यापेक्षा बचतगटाच्या सदस्यांनी माविम अथवा कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून असलेल्या अडचणी शंकाचे निरसन करावे असाही निभोणकर यांनी मोलाचा सल्ला दिला. या बचतगटाने इंटरनेट , वेगवेगळी पुस्तके, कृषी प्रदर्शने अशा माध्यमतून कांदा उत्पादना विषयी माहिती घेत या प्रकल्पाकडे काळजीपूर्वक लक्ष दयायला सुरु केले. महिलांनी वेळोवळी कांदा बीज व्यवस्थेत यावे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. एनएचएफाआरडीच्या वतीने दर महिन्यास कांदयाच्या पिकाचे अवलोकन केले जाते. त्यांच्या या अथक प्रयत्नांना आज फळ आले कांदा बीज उत्पादनाची शेती या महिलांनी यशस्वीपणे करुन दाखविली . या हंगामात बचतगटास या शेतीव्दारे अडीचशे क्विंटल बीज हाती आले आहे. हे बीज त्यांनी कराराप्रमाणे एनएचएफआरडीकडे सूपूर्द केले असून त्यांची गुणवत्ता तपासून त्यांची रक्कम लवकरच त्यांची हाती पडेल. 
ग्रामीण भागातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे येत असून उत्तम प्रकारे उदयोग करुन रोजगार उपलब्धतेबरोबर स्वावलंबी होण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. यांचा आदर्श इतरांनी घेतला तर रोजगार मिळून स्वावलंबी होऊ शकतो. हे खरोखरचमहिला सक्षमीकरणाचे हे उत्तम उदाहरण आहे. 


वित्तीय सहायता

यासाठी जे पैसापायी रडत आहे त्यांना शासकीय तसेच अनेक निमशासकीय, खाजगी योजनांमधून पैसा मिळवून उद्योग करता येऊ शकतो आवश्यक आहे ती फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिक मेहनतीची शेतकऱ्यांना शेतीसाठी वित्तसंस्थाकडून जे कर्ज मिळते, त्याचे कालावधीनुसार तीन विभागात वर्गीकरण केले जाते.
  • अल्प मुदतीचे कर्ज 
  • मध्यम मुदतीचे कर्ज 
  • दीर्घ मुदतीचे कर्ज 
शेती व्यवसायातील भांडवलाच्या गरजांचे स्वरूप त्यातून मिळणारे उत्पन्न. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज किती कालावधीत परतफेड करू शकेल. या सर्व गोष्टींवर हे वर्गीकरण आधारलेले आहे.
अल्प मुदतीची कर्जे
पंधरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या कर्जास अल्प मुदतीची कर्जे असे म्हणतात. शेतकरी वर्गाला शेती व्यवसाय लागवड खर्चासाठी वेळोवेळी बी – बियाणे, खते, औषधे, मजूर, जनावरांसाठी खाद्यखर्च इत्यादी गरजा भागवण्यासाठी पैसे लागतात. थोडक्यात म्हणजे, त्याला पीक उत्पादन होईपर्यंत खेळते भांडवल हवे असते. शेतकरी पीक हाती आल्यानंतर या रकमेची परत फेड करू शकतो. त्याचबरोबर शेतकर्या ला हे कर्ज अल्प काळाकरीता हवे असते. या कर्जास पीक कर्ज असेही म्हटले जाते.
मध्यम मुदतीचे कर्ज
ज्या कर्जाची मुदत पंधरा महिने ते पाच वर्षे असते. अशा कर्जांना मध्यम मुदतीचे कर्जे असे म्हणतात. शेतकऱ्यांना जमिनीची सुधारणा, विहीर खोदाई, जनावरे खरेदी, शेती यंत्रे खरेदी अशा काहीशा जास्त भांडवली खर्चासाठी या स्वरूपाचे कर्ज लागते. या प्रकारची कर्जे सहकारी पतसंस्था व वाणिज्य बँकाकडून घेतली जातात.
दीर्घ मुदतीचे कर्ज
पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी जी कर्जे दिली जातात त्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज असे म्हणतात. शेती व्यवसायात कायमस्वरूपी आणि भांडवली खर्चासाठी या प्रकारच्या कर्जाची आवश्यकता भासत असते.
उदारणार्थ : खर्चिक अशी यंत्र-सामुग्री घेण्यासाठी, जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी, जादा जमीन विकत घेण्यासाठी इत्यादी. अशी कर्जे ही यू – विकास बँकांसारख्या वित्त संस्थांकडून घेतली जातात.
नाबार्ड(NABARD) बॅंक ही शेतीविषयक संबंधित गरजांना अर्थसहाय्य करते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना वित्त संस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारे कर्ज दिले जाते.

टिप्पण्या

  1. खूपच छान, फायद्याचे आहे. मी लवकरच सुरु करणार आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान, फायद्याचे आहे. मी लवकरच सुरु करणार आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच छान, फायद्याचे आहे. मी लवकरच सुरु करणार आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. ऐखादा नविन उद्धोग माहीती अासल तर सागा अाणि माला पुर्णे प्रोज्कट रिर्पैट अासल कृपया द्या माला राजगीरा लाडू चा बनवण्याचा उध्दोगची माहीती द्या या ई मेल करा kolpkar@gmail.com फोन नंबर :९७०२०२७६०५

    उत्तर द्याहटवा
  5. खुपच महत्वपूर्ण माहिती आहे याचा नक्कीच फायदा होईल

    उत्तर द्याहटवा
  6. माहिती चागली आहे पण मार्क्टिन्ग बदल महितीअसावी व दयावी अशी माझी विनंती आहे

    उत्तर द्याहटवा
  7. माहिती चागली आहे पण मार्क्टिन्ग बदल महितीअसावी व दयावी अशी माझी विनंती आहे

    उत्तर द्याहटवा
  8. मला किराणा दुकान चालु करण्याविषयी माहिती दया.

    उत्तर द्याहटवा
  9. सर मला पेपर डीश व्यवसाय चालु करावयाचा आहे. मार्गदर्शन करावे ९६६५९०३३९७ as42769@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  10. मला पण दुध व्यवसाय सुरु करायचा आहे मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे number 7775833389

    उत्तर द्याहटवा
  11. खुप छान माहिती आपला whatsup ग्रूप असेल तर no add करावा 9922472999

    उत्तर द्याहटवा
  12. खुप छान माहिती आपला whatsup ग्रूप असेल तर no add करावा 9922472999

    उत्तर द्याहटवा
  13. व्यवसायाची एवढी सखोल माहीती उपलब्घ असतांना आम्ही न मिळणार्या नौकरीकडे का वळतो असा प्रश्न पडतो?
    सर्वांपर्यंत ही माहीती जावी
    सुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  14. खुप छान माहिती आपला whats app ग्रूप असेल तर no add करावा 9822672257

    उत्तर द्याहटवा
  15. खुप उपयुक्त माहीती.. मला नविन कृषी सेवा केन्द्र सुरू करावयाचे हेसंपूर्ण माहीती कुठं मिळेल

    उत्तर द्याहटवा
  16. खुप छान माहिती आपला whats app ग्रूप असेल तर no add करावा
    अभिजीत जगताप
    8805322298

    उत्तर द्याहटवा
  17. लघुउद्योगाविषयी माहिती पाहिजे मला....
    माझा मोबाईल नं:9503300919
    ई-मेल: samadhangarntc29@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  18. मला नविन कृषी सेवा केंद्र सुरू करावयाचे आहे कृपया मार्गदर्शन करा...

    उत्तर द्याहटवा
  19. मला पन व्यवसाय करायचा आहे मदत करा

    उत्तर द्याहटवा
  20. माझा नंबर 9960485601 मला सामील करा ग्रुप वर.

    उत्तर द्याहटवा
  21. सर मला दुग्ध व्यवसाय सुरू करायचे आहे माहीती दया मो . न . 7798458780

    उत्तर द्याहटवा
  22. खुप छान माहिती आपला whats app ग्रूप असेल तर no add करावा 7385867330

    उत्तर द्याहटवा
  23. माहिती खूप चांगली आहे. सेंट कसा तयार करावा याविषयी मला माहिती हवी आहे, माझा whatsapp no. 9673282801 आहे. कृपया मला माहिती मिळावी,

    उत्तर द्याहटवा
  24. माहिती खूप चांगली आहे. सेंट कसा तयार करावा याविषयी मला माहिती हवी आहे, माझा whatsapp no. 9673282801 आहे. कृपया मला माहिती मिळावी,

    उत्तर द्याहटवा
  25. सर नमस्कार,
    मला गाईंचा गोठा तयार करावयाचा आहे.
    plz call me 7720825714

    उत्तर द्याहटवा
  26. सर मला दुग्ध व्यवसाय सुरू करायचे आहे माहीती दया मो . न . 9970471797

    उत्तर द्याहटवा
  27. आपल्याला 100% कर्ज हवे आहे का? मी आपल्या आर्थिक गरजांना परताव्याच्या कमी समस्यांसह सर्व्ह करू शकतो म्हणूनच फक्त 2% साठी आम्ही आपल्याला निधी देतो. जे काही तुमची परिस्थिती, स्वयंरोजगार, सेवानिवृत्त, योग्य क्रेडिट रेटिंग आहे, आम्ही मदत करू शकतो. 1 ते 30 वर्षांपर्यंत लवचीक परतफेड. आमच्याशी संपर्क साधा: comfortfrankloanfirm@gmail.com






    आपण एक लांब किंवा अल्पकालीन कर्ज शोधत आहात

    1 पूर्ण नाव: ............................
    2 संपर्क पत्ता: .......................

    3.देश: .....................

    4.सैक्स: ...............

    5. कर्जाची रक्कम आवश्यक आहे: ....................
    6. कालावधी कर्ज: ...................
    7. डायरेक्ट टेलीफोन नंबर: .....................

    खूप प्रेम,

    Comfortfrankloanfirm@gmail.com



    एल
    Mrs: सोई

    उत्तर द्याहटवा
  28. कृपया कांदा भरण्यासाठी गोणी प्रकल्प ची माहिती द्यावी कच्चा माल कुठे मिळेल वैगरे
    Email-trugan123@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  29. बिन भांडवलि वयवसाय करायचा असलयास संपक करा
    09964608723 Wtsup no.योगय मागदरशन मिळेल

    उत्तर द्याहटवा
  30. चुप छान आहे
    व लोकान समजेल
    येवढी सोपी आहे
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  31. व्यवसाय सुरू करताना भाङवल उपलब्ध होत नाही. शासकीय बॅकेचे आधिकारी सहकार्य करीत नाहीत. परिणामी व्यवसाय करताना अडचणी येतात

    उत्तर द्याहटवा
  32. मित्रांनो प्रथम सर्वांचे आभार
    आपण माझ्या ब्लॉगला भेट देऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला
    पण म्या आपणास वेळेवर उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व
    लवकरच आपन माहिती देण्यासाठी स्वतंत्र युनिट सुरू करत आहोत
    म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक व्यवसायाची आणि उद्योगाची सविस्तर व वेळेवर माहिती मिळेल
    प्रश्न विचारताच तुम्हाला फोन करून किंवा संबंधित प्रश्नाला अनुसरून पोस्ट टाकून माहिती दिली जाईल .आपण माझ्या ब्लॉगला अशीच भेट देत राहाल ही अपेक्षा बाळगतो
    सर्वांचे खूप खूप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  33. मित्रांनो प्रथम सर्वांचे आभार
    आपण माझ्या ब्लॉगला भेट देऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला
    पण म्या आपणास वेळेवर उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व
    लवकरच आपन माहिती देण्यासाठी स्वतंत्र युनिट सुरू करत आहोत
    म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक व्यवसायाची आणि उद्योगाची सविस्तर व वेळेवर माहिती मिळेल
    प्रश्न विचारताच तुम्हाला फोन करून किंवा संबंधित प्रश्नाला अनुसरून पोस्ट टाकून माहिती दिली जाईल .आपण माझ्या ब्लॉगला अशीच भेट देत राहाल ही अपेक्षा बाळगतो
    सर्वांचे खूप खूप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  34. खूप छान माहिती दिली thanks. WHATSAPP GROUP ad pls. 9372825403. Valmik. Suryavanshi jalgaon.

    उत्तर द्याहटवा
  35. खुप छान माहिती दिली thanks. मला स्पिरुलिना शेवाळ माहीती कुठे मिळेल

    उत्तर द्याहटवा
  36. मला डेअरी फाम चालू करावयाचा आहे
    माहिती कोठे मिळणार,?

    उत्तर द्याहटवा
  37. खूपच सुंदर माहिती मिळाली, आम्ही गडचिरोली जिल्ह्यात राहतो, आमच्या कडे भात पीक घेतले जाते जुन ते डिसेंबर भात पीक असते त्यानंतर काय करता येईल मार्गदर्शन करावे,माती काली आहे, पाणी पुरवठा सिंचन कालव्यातून होते,जाने. ते मे शेती साधारण खाली असते।

    उत्तर द्याहटवा
  38. खूप छान माहिती आहे आहे कृपया आपल्या ग्रुपला ADD KRA 7709658560

    उत्तर द्याहटवा
  39. सरळ आणि सोप्या भाषेत समजावुन सांगितले आहे

    उत्तर द्याहटवा
  40. आम्ही विदर्भातील शेतकरी आहोत आम्हाला शेती बरोबर कुठला चांगला व्यवसाय करता येईल

    उत्तर द्याहटवा
  41. hi me Maya Yesaji ..
    rahanar Mumbai , Mala laghu udyog suru Karayach ahe tyasathi mala ya site war khup changali mahiti milali ,

    उत्तर द्याहटवा
  42. निम करंगी पेंड तयार करणार उदयोग कराचा आहे माहिती हवी आहे

    उत्तर द्याहटवा
  43. निमोळी पेंड करंगी पेंड तयार करणार उदयोग कराचा आहे 9766594102

    उत्तर द्याहटवा
  44. शेतीपुरक व्यवसाया संदर्भात खूप छान माहिती

    उत्तर द्याहटवा
  45. शेतीपुरक व्यवसाया संदर्भात खूप छान माहिती

    उत्तर द्याहटवा
  46. सुंदर आहे.
    महिला बचत गट व इतर सर्व घरबसल्या करता येणाऱ्या उद्योगांची माहिती द्यावी कामांची यादीच असावी,दैनदिन कामकाज व त्यासंबंधी व्यवसायाची माहिती असावी.महिला बालकल्याण मधून मिळणार्या सेवांची सविस्तर माहिती असावी.

    उत्तर द्याहटवा
  47. सर नाश्ता सेन्टर चालू करायचा आहे प्लीज मला महिती द्या

    उत्तर द्याहटवा
  48. Dall Mill संबंधी माहिती विचारू शकता 8637701788

    उत्तर द्याहटवा
  49. अजुन इतर उधोगाची माहिती लोड करावी

    उत्तर द्याहटवा
  50. खडू निर्मिती माहिती हवी आहे 9136035177

    उत्तर द्याहटवा
  51. छान माहिती दिली,बिनभांडवली,उद्योगा बाबत माहीती द्या.नविनउद्योग सुरु करणाऱ्यां ना बँक लवकर कर्ज देत नाही.

    उत्तर द्याहटवा
  52. छान माहीती.... सर तुम्ही पेपर कॅरी बॅग उद्योगा विषयी माहिती असेल तर ती कृपया द्या

    उत्तर द्याहटवा
  53. बांबूला नियमित पाण्याची गरज असते हे आपलं मत चुकीचं आहे.

    उत्तर द्याहटवा
  54. चप्पल विक्रीचा चिल्लर व्यवसाय विषयी माहिती व नफा किती प्रमाणात असते माहिती देणे

    उत्तर द्याहटवा
  55. Hi sir, konitari mala vyavsayachi mahiti 9619092016 ya numbervar kalva aani please margdarshan karave vyaysayasathi.

    उत्तर द्याहटवा
  56. मला कांदा गोणी तयार करायची कंपनी टाखायची आहे तरी मला मशीन ची व रॉ मटेरियल ची माहिती द्या? 9637566823

    उत्तर द्याहटवा
  57. खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  58. निंबोळी पासुन तेल,पावडर, खत,पेंड तयार करायची माहिती दयावी सर

    उत्तर द्याहटवा
  59. प्लास्टिक स्क्रॅप बद्दलची माहिती द्यावी सर
    7588734493

    उत्तर द्याहटवा
  60. पांढरी मुसळी बद्दल माहिती देया की सर

    उत्तर द्याहटवा
  61. Sir mla kahi tari udogdanda karycha ye pn konta kru ky suchat nahi bhandval pn fars nahi ye kalpna tr far ahet pn....

    My contact no. 8788921264

    उत्तर द्याहटवा
  62. Sir मला किराणा दुकान चालू करायचं आहे काय करावे सांगा पण रुपये नाही काही सल्ला दया

    उत्तर द्याहटवा
  63. मराठीतून व्यवसायाचे शिक्षण देणारे उपक्रम आहेत का ? आणि असतील तर मुंबईत कुठे आहेत ?

    उत्तर द्याहटवा
  64. सर मला तुमच्या ऑफिस पत्ता सेड करा 7350456221ह्या नबरव

    उत्तर द्याहटवा
  65. जुन्नर आंबेगाव शिरूर या तालुक्यात Sahu क्रिकेट बॉल ची एजेंसी हवी असल्यास कॉल करा 8432153536

    उत्तर द्याहटवा
  66. खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण लिखाण.
    अजून काही असे छोटे उद्योग असतील तर माहिती द्या.

    उत्तर द्याहटवा
  67. खूप छान भाजीपाला डीहायड्रेशन प्रकल्पाविषयी माहिती

    उत्तर द्याहटवा
  68. खुप खुप आभार.
    खूप छान आणि महत्त्वाची माहीती आहे.
    धन्यवाद सर 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  69. कृपया मुंबईत कुठला व्यवसाय 10000 हजार रुपयात होईल याची माहिती मिळाली तर खूप उपकार होतील

    उत्तर द्याहटवा
  70. Our teammates loved it, as we started our dimeapp IPL with big smiles and great memories.
    Thank you for being such a dedicated team, and hitting this season of the dimeapp IPL out of the park!
    Want to join the dimeapp.in Team? Find your spot at apply on dimeapp.in
    Each day, our teammates give their 100% on the field, and we’re grateful for their efforts, as well as the support extended to them by their loved ones.
    So with the excitement around the first-ever dimeapp IPL at its peak, we shared our gratitude by sending out Gourmet Chocolates and Customised T-shirts so that they could celebrate the occasion in style!
    What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.

    At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!

    Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeappIPL is a testimony of our positivity, and our confidence.

    So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!

    उत्तर द्याहटवा
  71. आमचा पोर्टेबल ऑक्सिजन कॅनचा बिझिनेस आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व मशिन्स आमच्याकडे आहेत. सध्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठया प्रमाणात असल्यामुळे आमचा बिझिनेस चांगला होत आहे. कालांतराने कोरोनाचा काळ निघून जाणार हे नक्कीच. पण मग त्या मशिन्सचे करायचे काय? त्या कशासाठी वापरायच्या? तसेच असा कोणता जोडधंदा आमच्यासाठी चांगला ठरेल ज्याची मागणी भारतातच नाही तर परदेशातही असेल? नागरीकांना मार्केटमध्ये पुढे जाऊन कशाची कमी असेल? असा कुठला व्यवसाय किंवा प्लांट निर्माण करु जो लाखोंचा नाही तर करोडोचा फायदा करुन देईल.अशा सर्व प्रश्नांतून मला मार्ग सापडत नाही आहे. कृपया मला मदत करावी. माझा मोबाईल नं. 8169934150

    उत्तर द्याहटवा
  72. आमचा पोर्टेबल ऑक्सिजन कॅनचा बिझिनेस आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व मशिन्स आमच्याकडे आहेत. सध्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठया प्रमाणात असल्यामुळे आमचा बिझिनेस चांगला होत आहे. कालांतराने कोरोनाचा काळ निघून जाणार हे नक्कीच. पण मग त्या मशिन्सचे करायचे काय? त्या कशासाठी वापरायच्या? तसेच असा कोणता जोडधंदा आमच्यासाठी चांगला ठरेल ज्याची मागणी भारतातच नाही तर परदेशातही असेल? नागरीकांना मार्केटमध्ये पुढे जाऊन कशाची कमी असेल? असा कुठला व्यवसाय किंवा प्लांट निर्माण करु जो लाखोंचा नाही तर करोडोचा फायदा करुन देईल. अशा सर्व प्रश्नांतून मला मार्ग सापडत नाही आहे. कृपया मला मदत करावी. माझा मोबाईल नं. 8169934150

    उत्तर द्याहटवा
  73. आमचा पोर्टेबल ऑक्सिजन कॅनचा बिझिनेस आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व मशिन्स आमच्याकडे आहेत. सध्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठया प्रमाणात असल्यामुळे आमचा बिझिनेस चांगला होत आहे. कालांतराने कोरोनाचा काळ निघून जाणार हे नक्कीच. पण मग त्या मशिन्सचे करायचे काय? त्या कशासाठी वापरायच्या? तसेच असा कोणता जोडधंदा आमच्यासाठी चांगला ठरेल ज्याची मागणी भारतातच नाही तर परदेशातही असेल? नागरीकांना मार्केटमध्ये पुढे जाऊन कशाची कमी असेल? असा कुठला व्यवसाय किंवा प्लांट निर्माण करु जो लाखोंचा नाही तर करोडोचा फायदा करुन देईल. अशा सर्व प्रश्नांतून मला मार्ग सापडत नाही आहे. कृपया मला मदत करावी. माझा मोबाईल नं. 8169934150

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………।

 हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………। मि त्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे ,  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर  तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द , प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि  देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात  अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही . संगणकाच्या युगात वावरत असतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच ,  फक्त त्या संकटांना हरवता आल पाहिजे . त्यांना हरवत असतांना तुम्हाला अपयश येईल पण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे . या येणाऱ्या अपयाशांपही बरेच जण हरले , यातच काहीनि  मिळालेल्या संधीला शेवटची समजून आत्महत्या हि  केली  मा...

उद्योगमित्र

मित्रानो प्रत्येकाला वाटत आपण खूप मोठ्ठ व्हाव खूप खूप पैसे कमवावे . सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगाव . त्यासाठी तो मनापासून प्रयत्नं करतोही परंतु त्याला निराशाच पदरी पडते . अशावेळी तो खूप खचून जातो आणि वेगळ्या मार्गाला लागतो या अपयशाला तो आपल शेवटचा निर्णय मानतो आणि अपयशाने दुखी मनाला तो व्यसनांच्या आधार देत आपल उर्वरित आयष्य वय घालवतो . आपण एवढ शिकूनही आपल्याला न नोकरी मिळाली अन ना धंद्यात यश मिळाल यातच आपली या अश्या विचारातच आपल्याला आजची तरुणाई बघायला मिळेल , काही याला अपवाद हि ठरतील परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतपत असेल यात शंका नाही ,. का म्हणून या निराश झालेल्यांना समजत नाही कि अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ते , का म्हणून यांना अस वाटत कि यांना मिळालेली संधी हि शेवटची असते अस आणि अस मानून निराशा नाहीतर काय आनंद याच्या पदरी पडणार . आणि हो काही महाभाग तर याचापाई काही आपल आयुष्य संपवतात ,या तात्पुरत्या समससेवर यांना मृत्यू हाच कायमचा इलाज वाटतो . का म्हणून यांना ह्या एवढ्या सुंदर आयुष्याला जगाव अस वाटत नाही . मला तर जिंकत असतांना हरनार्यांची आणि वेळेआधी मरणाऱ्याची अश्या लोक...