मुख्य सामग्रीवर वगळा

आपले हात आणि बुध्दी तर लॉकडाऊन झाले नाही ना....


कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. एक एक देश कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे मात्र वेगाने त्याचा फैलाव होत आहे. भारतातही कोरोनाने जोरदार धडक दिली. कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे या कोरोनामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातच लॉकडाऊन झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने आपल्या आहे त्या ठिकाणच्या रोजगारावर कुर्‍हाड कोसळते की काय? लॉकडाऊनमुळे आपला रोजगारच लॉकडाऊन तर नाही होणार ना? अशी भिती अनेकांमध्ये भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक जण चिंतेत आहे. मात्र मित्रांना घाबरु नका, कंपनी, संस्था, आपला रोजगार लॉकडाऊन केला तरी आपली हात व बुध्दी तर लॉकडाऊन नाही करणार ना! त्यामुळे भिती कसली, मेरा हात जगन्नाथ याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवा. चिंता करण्यात आपली उर्जा वाया न घालविता. नवीन काय करता येईल की ज्यातून आपल्याला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, हा विचार करण्यात इनर्जी खर्च करा. तर करा मग विचार करायला सुरुवात... मी आहेच तुमच्या सोबतीला.


गेल्या काही दिवसांपासून आपण घरातच आहोत. अनेक जणांचे पगार झाले तर. अनेकांना कमी दिवसांचा पगार मिळाला. तर काहींना मिळालाच नाही. यानंतर कंपनी बंद असल्याने घरी असलेल्यांपैकी काहींनाच पगार मिळेल अशी शक्यता आहे. थोडक्यात आहे त्या पैशांमध्ये लॉकडाऊनचा काळ सर्वांना पार पाडायचा आहे. यानंतर रोजगारावर गदा आली तर...त्यामुळे आपल्या दुसरा पर्याय असायला हवा. कारण पैसा भगवान तो नही लेकीन भगवान से कमी नाही. याप्रमाणे आजच्या काळात जगण्यासाठी पैसा आवश्यक आहेत. अनेक जणांवर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे अशांचा रोजगार गेला तर पूर्ण कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे काय? हा प्रश्‍नही बहुतेक जणांना सतावत असणार... पण चिंता करुन उपयोग नाही.. आणि ते कुणीतरी म्हटले आहे ना! की ‘चिंता चिता के समान’ है. त्यामुळे चिंता करुन उपयोग नाही. ऐन वेळी उद्या आपल्याला कळविण्यात येईल की आपण रोजगार गेला. तर त्यादिवसाची वाट पाहू नका. चिंता करण्यापेक्षा आजपासून पुढे काय करायचे हा विचार करा...

आता तुम्ही म्हणाल की, पर्याय काय निवडायचा आणि जर काही धंदा करावयाचा असेल तर त्यासाठी पैसा कुठून आणायचा? तर हा प्रश्‍न बरोबर आहे. त्यामुळे मी आधीच म्हटल की प्रत्येकाने विचार करा. विचार करा म्हणजे. प्रत्येकाने कागदावर आपल्याला सुचत असणार्‍या आयडीया लिहा. यात कोणता व्यवसाय आपण करु शकतो? त्याची वेगळी लिस्ट तयार करा. या लिस्टमधील कोणत्या व्यवसायासाठी आपल्या किती भांडवल लागेल? आपल्याकडे तेवढे भांडवल अथवा पैसे आहेत काय? संपूर्ण भांडवल लावल्यानंतर व्यवसायातून पैसे किती व कसे मिळतील? हे सुध्दा लिहा. कागदावर यासाठी लिहायला सांगतो आहे की, एखादी गोष्ट आठवली की आपण लगेच विसरतो सुध्दा. कागदावर घेतलेली प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहिल यापेक्षा ती समोर राहिल. हे करत असतांना आपल्या कुटुंबातील प्रत्येकाशी स्पष्ट चर्चा करा. ते सुध्दा आपल्याला मदत करतील. कारण प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात.


ऑनलाईन डिलेव्हरी कंपन्यांचे महत्व वाढणार
कोरोना आणि लॉकडाऊननेे जगाला खुप सार्‍या गोष्टी शिकविल्या आहेत. यात काय करावे व काय करु नये अशा गोष्टीची लांबलचक यादी तयार होईल. भविष्यात गर्दी टाळण्यासाठी लोक ऑनलाईन वस्तु मागवतील. त्यादृष्टीने आपल ऑनलाईन डिलेव्हरीची सुविधा देणार्‍या कंपन्यांचे महत्व लॉकडाऊन नंतर वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार आप-आपल्या शहरात आपण असलेल्या भांडवलानुसार एखादी ऑनलाईन सेवा देणारी ऑनलाईन कंपनी अथवा व्यवसाय उघडता येईल. व आपली खाद्यपदार्थ किंवा वस्तू ऑनलाईन डिलेव्हरीच्या माध्यमातून घरोघर पोहचला येईल. तर दुसरीकडे भांडवल नसेल तर आपण आपली वस्तू संबंधित ऑनलाईन डिलेव्हरीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो. कारण ग्राहक आपल्या दुकानापर्यंत येईल, यांची शक्यता  फार कमी राहणार आहे. त्यामुळे थेट त्याच्यापर्यंत कुठली वस्तू कशी पोहचले त्या कंपनीला व वस्तूला तो प्राधान्य देणार आहे.


प्रशिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे राहा
बेरोजगारीची आधीच गंभीर समस्या आहे. त्यानुसार लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार जाण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा, यासह विविध शासकीय सेवांमध्ये अर्ज करणार्‍यांची संख्या वाढेल. इतर खाजगी संस्थांसह कंपन्यांमध्ये कामासाठी स्पर्धा वाढेल. त्यामुळे प्रत्येकाला रोजगार मिळेल याची फार खात्री नजीकच्या काळात राहील. त्यामुळे अमर्यादीत ते व्यवसाय आहेत, त्याचे प्रशिक्षण घेण्याकडे नागरिकांचा कल वाढेल.
प्रशिक्षण घेतले की स्वतःचा व्यवसाय प्रत्येक जण करु शकतो. त्यामुळे नोकरीच्या भरवशावर अवलंबून न राहता, खाद्यपदार्थ बनविणे, ड्रेस मेकिंग, यासह सुतार यासह इतर कामांचे प्रशिक्षण घ्यावे. कारण यात प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करता येता, दुसरे असेकी अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. स्वतः आपण कुठल्या गोष्टीबाबत प्रशिक्षित असाल तर शासनाच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्र सुरु करुन इतरांना प्रशिक्षण देवू शकतो. कारण प्रशिक्षण घेणार्‍यांची संख्या वाढल्याने आपोआपच प्रशिक्षण केंद्रही तयार होती. कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राना शासन प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अनुदान हे देते. त्यामुळे हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहेत.
याबाबत प्रत्येक जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगार विभागात अधिक माहिती मिळू शकते.

       प्रत्येकाने दूरदृष्टी ठेवून काळाची गरज ओळखा व त्यानुसार  विचार करायला शिका. सोच बदलो..देश बदलो याप्रमाणे काळानुरुप स्वतःच्या व्यवसायात किंवा स्वतःत बदल करणे गरजेचे आहे...बस एवढेच


धन्यवाद


*लॉकडाऊनच्या काळात स्टार्टअपच्या संधी... राहुल नार्वेकरांसोबत ऑनलाईन गप्पा...*


करोनामुळे सर्व विद्यापीठे लॉकडाऊन आहेत. परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्षाचीप्रवेश प्रक्रिया आदी सर्वच अधांतरी असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्य टांगणीला लागले आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मिळणारी प्लेसमेंट नाही आणि त्यामुळे चांगल्या नोकरीचे स्वप्नही करोनामुळे अपूर्ण राहणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते असल्याने हे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. याकरीता दैनिक जनशक्ति जळगावच्या संयुक्त विद्यमाने तरुणांना  ‘स्टार्टअप’ बाबत मार्गदर्शन व्हावे याकरीता द इंडीया नेटवर्क आणि स्टार्टअप स्टुडीओचे सीईओ श्री. राहुल नार्वेकर यांचा खुला ऑनलाईन इंटरव्ह्यूव


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अबब……. ! एवढे उद्योग असतांना पण आम्ही रिकामेच

मित्रांनो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हि जी म्हण कोणी म्हटली आहे ती अगदी खरी, कारण करायसाठी खूप आहे पण आपले प्रयत्न्न प्रामाणिक नाहीत त्यामुळे आपण मागे राहिलो आहोत . तसच उद्योगांच्या बाबतीत पण खूप सारे उद्योग आहेत परंतु आपल्याला ती माहितीच नाहीत माहित असतीलही परंतु ती कशी करावी हे माहित नसेल तर त्यासाठी मी आहे ना ! काळजी कसली करता फक्त मिळालेल्या माहितीला मार्गदर्शन समजून आपला उद्योग निच्छित करा तर घ्या हि उद्योगांची लंबीचौडी यादी आणि ते कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती . व्यवसायाला सुरुवात करताना व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे व्यवसायाची पूर्वतयारी कशी करावी हे पाहू. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.  व्यवसायाचे स्वरूप आणि संधी –  आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवसायामध्ये मन लावून काम केले जात ...

हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………।

 हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………। मि त्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे ,  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर  तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द , प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि  देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात  अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही . संगणकाच्या युगात वावरत असतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच ,  फक्त त्या संकटांना हरवता आल पाहिजे . त्यांना हरवत असतांना तुम्हाला अपयश येईल पण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे . या येणाऱ्या अपयाशांपही बरेच जण हरले , यातच काहीनि  मिळालेल्या संधीला शेवटची समजून आत्महत्या हि  केली  मा...

उद्योगमित्र

मित्रानो प्रत्येकाला वाटत आपण खूप मोठ्ठ व्हाव खूप खूप पैसे कमवावे . सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगाव . त्यासाठी तो मनापासून प्रयत्नं करतोही परंतु त्याला निराशाच पदरी पडते . अशावेळी तो खूप खचून जातो आणि वेगळ्या मार्गाला लागतो या अपयशाला तो आपल शेवटचा निर्णय मानतो आणि अपयशाने दुखी मनाला तो व्यसनांच्या आधार देत आपल उर्वरित आयष्य वय घालवतो . आपण एवढ शिकूनही आपल्याला न नोकरी मिळाली अन ना धंद्यात यश मिळाल यातच आपली या अश्या विचारातच आपल्याला आजची तरुणाई बघायला मिळेल , काही याला अपवाद हि ठरतील परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतपत असेल यात शंका नाही ,. का म्हणून या निराश झालेल्यांना समजत नाही कि अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ते , का म्हणून यांना अस वाटत कि यांना मिळालेली संधी हि शेवटची असते अस आणि अस मानून निराशा नाहीतर काय आनंद याच्या पदरी पडणार . आणि हो काही महाभाग तर याचापाई काही आपल आयुष्य संपवतात ,या तात्पुरत्या समससेवर यांना मृत्यू हाच कायमचा इलाज वाटतो . का म्हणून यांना ह्या एवढ्या सुंदर आयुष्याला जगाव अस वाटत नाही . मला तर जिंकत असतांना हरनार्यांची आणि वेळेआधी मरणाऱ्याची अश्या लोक...